AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hathras Stampede: हाथरस दुर्घटना नेमकी कशी घडली? सत्संगानंतर अचानक चेंगराचेंगरी कशी झाली?

Hathras Stampede: दुर्घटनेनंतर आता प्रशासन एक्शन मोडमध्ये आले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात गर्दी जास्त होती आणि बंदोबस्तासाठी पुरेसा फोर्स नव्हती, हे स्पष्ट झाले आहे.

Hathras Stampede: हाथरस दुर्घटना नेमकी कशी घडली? सत्संगानंतर अचानक चेंगराचेंगरी कशी झाली?
Hathras Stampede
| Updated on: Jul 03, 2024 | 10:06 AM
Share

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एका सत्संगादरम्यान मोठी दुर्घटना घडली. या ठिकाणी चेंगराचेंगरीत 121 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा यांच्या सत्संग दरम्यान चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ते स्वत: घटनास्थळी पोहचले आहे. आता ही दुर्घटना घडली कशी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

केवळ 40 पोलिसांचा बंदोबस्त

दुर्घटनेनंतर मंत्री, डीजीपी सर्वांनी घटनास्थळावर धाव घेतली आहे. या सत्संगाची परवानगी घेण्यात आली होती. हजारो जणांची गर्दी घटनास्थळी जमणार होती. परंतु त्यासाठी केवळ 40 पोलिसांचा बंदोबस्त होता, असा दावा केला जात आहे. तसेच रुग्णवाहिका किंवा डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली नव्हती. भोले बाबाचे सत्संग संपल्यानंतर धावपळ सुरु झाली. चेंगराचेंगरी झाली. एकावर एक दबून लोकांचा मृत्यू होऊ लागला. त्या ठिकाणी चिखलही झाला होता. भाविक चिखलात पडत होते. एकावर दुसरा येऊन पडत होता. जे खाली पडले ते पुन्हा उठू शकले नाही.

घटना नेमकी कशी घडली

संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या या घटनेनंतर भोले बाबा फरार झाले आहेत. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, फुलराई मैदानावर उघड्यावर सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमधील 50,000 हून अधिक बाबांचे अनुयायी यात सहभागी आले होते. सत्संग संपल्यावर भाविक पुढे आले आणि बाबांजवळ जमा झाले. त्यांचे आशीर्वाद घेऊ लागले. त्यांच्या चरणांची धूळ घेऊ लागले. त्या ठिकाणी एक खड्डा होता. सुरुवातील धक्का लागल्यावर काही जण पडले. त्यानंतर धावपळ सुरु झाली. जे पडले ते परत उठू शकले नाही. गर्दी त्यांच्या आंगावरुन चालत होती. पाहता, पाहता मोठी दुर्घटना घडली, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

दुर्घटनेनंतर आता प्रशासन एक्शन मोडमध्ये आले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात गर्दी जास्त होती आणि बंदोबस्तासाठी पुरेसा फोर्स नव्हती, हे स्पष्ट झाले आहे. पोलीस आणि प्रशासनाने सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या अपुऱ्या उपाययोजनेसंदर्भात कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.

Follow Us
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.