AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात रेबीजचमुळे किती लोकांचे मृत्यू होतात ? आकडेवारी वाचून तुम्हालाही धक्का बसेल

भारतात मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यामुळे होणारे हल्ले एक गंभीर समस्या बनली आहे. त्यातच कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली असून, रेबीजमुळे होणारे मृत्यूही चिंतेचा विषय बनले आहेत. जगात दरवर्षी किती लोकांचा रेबीजमुळे मृत्यू होतो, हे जाणून घेण्यासाठी हा सविस्तर लेख वाचा.

देशात रेबीजचमुळे किती लोकांचे मृत्यू होतात ? आकडेवारी वाचून तुम्हालाही धक्का बसेल
| Edited By: | Updated on: Aug 16, 2025 | 5:21 PM
Share

भारतात मोकाट कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यांची वाढती संख्या आणि त्यामुळे होणारे हल्ले, रेबीजमुळे होणारे मृत्यू, हे चिंतेचे विषय आहेत. 2019 च्या 20 व्या पशुगणनेनुसार, भारतात 1.53 कोटी मोकाट कुत्रे होते, ही संख्या 2012 च्या तुलनेत थोडी कमी होती. पण दिल्लीसारख्या शहरात ही संख्या 60,472 पेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे, जो आता आणखी वाढला असावा. उत्तर प्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या सर्वाधिक आहे. उत्तर प्रदेशात 20 लाख आणि महाराष्ट्रात 12.7 लाख कुत्रे नोंदवले गेले आहेत.

कुत्र्यांच्या हल्ल्याची आकडेवारी

देशभरात कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

वर्ष 2024: देशभरात कुत्र्यांच्या हल्ल्याच्या 37,15,713 घटना नोंदवण्यात आल्या.

दिल्लीतील आकडेवारी (2025): दिल्लीमध्ये फक्त जानेवारी 2025 मध्ये 3,196 (रोज सुमारे 103) कुत्र्यांच्या चावण्याच्या घटना समोर आल्या.

मागील वर्षांची आकडेवारी (दिल्ली): 2024 मध्ये 25,210 (रोज सुमारे 69), 2023 मध्ये 17,874 (रोज सुमारे 49), आणि 2022 मध्ये 6,691 (रोज सुमारे 18) घटना नोंदवण्यात आल्या होत्या.

रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या

रेबीज हा एक 100% घातक आजार आहे, ज्यावर वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यू निश्चित आहे. सरकारी अहवालानुसार, भारतात दरवर्षी सुमारे 300 लोकांचा रेबीजमुळे मृत्यू होतो.

जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) अहवाल:

डब्ल्यूएचओच्या मते, भारतात दरवर्षी 18,000 ते 20,000 लोकांचा रेबीजमुळे मृत्यू होतो. याचे कारण म्हणजे, अनेक प्रकरणे नोंदवली जात नाहीत. 2024 मध्ये कुत्र्यांच्या हल्ल्याची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक आणि बिहारमधून नोंदवली गेली.

या समस्येवर उपाययोजना

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश: 11 ऑगस्ट 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमधील सर्व मोकाट कुत्र्यांना 6-8 आठवड्यांच्या आत रस्त्यांवरून हटवून निवारागृहात पाठवण्याचा आदेश दिला आहे. मात्र, प्राण्यांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या संस्थांनी या आदेशाला अव्यवहार्य आणि अशास्त्रीय म्हटले आहे, कारण इतक्या मोठ्या संख्येने कुत्र्यांसाठी निवारागृहांची कमतरता आहे.

सरकारी योजना: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 2030 पर्यंत भारतात रेबीजचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी ‘पशु जन्म नियंत्रण नियम, 2001’ (2010 मध्ये सुधारित) लागू करण्यात आला आहे. या नियमानुसार, मोकाट कुत्र्यांचे रेबीजविरोधी लसीकरण आणि नसबंदी करण्याचे नियोजन आहे.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.