मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचूक यांचं तब्बल 21 दिवस दिल्लीमधील जंतर मंतर मैदानावर उपोषण सुरू होतं, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान आता रुग्णालयातून सोनम वांगचूक यांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.

मोठी बातमी! ...तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ
Sonam Wangchuk
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 22, 2026 | 8:55 PM

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचूक यांचं तब्बल 21 दिवस दिल्लीमधील जंतर मंतर मैदानावर उपोषण सुरू होतं, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान आता रुग्णालयातून सोनम वांगचूक यांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 25 वा दिवस आहे.

नेमकं काय म्हणाले सोनम वांगचूक?

‘नमस्कार मित्रांनो मी अजूनही जिवंत आहे, आज माझ्या उपोषणाचा 25 वा दिवस आहे. 25 दिवसांमध्ये माझं जवळपास 11 किलो वजन कमी झालं आहे. माझ्या पेशी आता मोठ्या संख्येनं कमी होत आहे, परंतु मी अजूनही चांगला आहे. मंगळवारी रात्री मला गुडगावमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मी त्या सर्व विद्यांर्थ्यांचं कौतुक करतो, या विद्यार्थ्यांनी लाठीचार्ज होत असाताना देखील खूप शांततेत आंदोलन केलं, या विद्यार्थ्यांना अनेकदा हिंसेसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न झाला, आंदोलनस्थळी दगडफेक करण्यासठी काही लोक आणण्यात आले, परंतु तरी देखील या विद्यार्थ्यांनी आपला थोडा देखील संयम ढळू दिला नाही. त्यांनी अतिशय शांततेत आंदोलन केलं.

मी खूप भावुक झालो, त्यांच्यावर खूप क्रूरपणे लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळेच मी माझं उपोष सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. मला अनेक नेते भेटून गेले, त्यांनी मला उपोषण सोडण्याची विनंती केली, ज्यामध्ये मंत्र्यांचा देखील समावेश होता, खासदारांनी देखील माझी भेट घेतली, मी माझं उपोषण सोडावं आणि पुन्हा एकदा देशाच्या सेवेला सुरुवात करावी अशी विनंती त्यांनी मला केली. मला स्वत:ला देखील असंच करावं वाटतं, मला माझं काम खूप महत्त्वाचं आहे. पण मी सरकारला विनंती करतो की, पुन्हा विद्यार्थ्यांवर असा बळाचा वापर करू नका, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करू नका, ज्यामुळे त्यांना भविष्यात त्रास होऊ शकतो, जर मला सरकारने या दोन गोष्टींचं आश्वासन दिलं तर मी आजच माझं उपोषण मागे घेईल, परंतु जर असं आश्वासन आलं नाही तर दुर्दैवाने मला हे उपोषण सुरूच ठेवावं लागेल, असं सोनम वांगचूक यांनी म्हटलं आहे.

 

विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज 

दरम्यान सोमवारी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढला होता. यावेळी पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आले. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रुधुराचा मारा केला तसेच विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. या घटनेनंतर देशात चांगलंच वातावरण तापलं आहे.

 

 

Follow Us