AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IC 814 Hijack : कंदहार विमान अपहरण प्रकरणात चूक कोणाची? माजी RAW चीफ स्पष्टपणे बोलले

IC 814 Hijack : ‘IC 814: द कंदाहार हायजॅक’ वेबसीरीजमुळे 25 वर्षापूर्वीची विमान अपहरणाची घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. माजी रॉ प्रमुखांनी यावर भाष्य केलं आहे. त्यावेळी काय परिस्थिती होती? काय करायला पाहिजे होतं? यावर रॉ प्रमुख बोलले आहेत. परकीय शत्रूपासून देशाच संरक्षण करणं, त्यांच्या कारस्थानांची माहिती मिळवणं, ही रॉ ची जबाबदारी आहे.

IC 814 Hijack : कंदहार विमान अपहरण प्रकरणात चूक कोणाची? माजी RAW चीफ स्पष्टपणे बोलले
, ic 814 kandahar highjacking
| Updated on: Sep 04, 2024 | 11:12 AM
Share

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘IC 814: द कंदाहार हायजॅक’ या वेबसीरीजमुळे 25 वर्षापूर्वीची विमान अपहरणाची घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नेपाळची राजधानी काठमांडूवरुन दिल्लीला येण्यासाठी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाने उड्डाण केलं. पण हवेत असतानाच हे विमान हायजॅक करण्यात आलं होतं. या वेबसीरीजमुळे अनेक मुद्यांवर पुन्हा एकदा वादविवाद सुरु झाला आहे. तत्कालीन सरकारने ती परिस्थिती कशी हाताळली? वेगवेगळ्या तपास यंत्रणांचा त्यात सहभाग असे अनेक मुद्दे आहेत. 1999 साली IC 814 विमानाच अपहरण झालं. त्यावेळी एएस दुलत ‘रॉ’ चे प्रमुख होते. ‘रॉ’ म्हणजे रिसर्च अँड एनलिसिस विंग. रॉ कडे देशाच्या बाह्य सुरक्षेची जबाबदारी असते.

परकीय शत्रूपासून देशाच संरक्षण करणं, त्यांच्या कारस्थानांची माहिती मिळवणं, ही रॉ ची जबाबदारी आहे. एएस दुलत विमान अपहरणाच्या विषयावर बोलले आहेत. ‘निर्णय घेण्याची वेळ आली, त्यावेळी सगळी गडबड झाली’ असं माजी रॉ प्रमुख एएस दुलत यांनी मान्य केलय. ते इंडिया टुडे टीव्हीशी बोलत होते. “अमृतसरमध्ये विमान उतरल्यानंतर ते भारताच्या हद्दीबाहेर जाणार नाही हे सुनिश्चित करण्याची आम्हाला संधी मिळाली होती. पण विमान अमृतरसरमधून उडाल्यानंतर डील करण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नव्हता. चर्चेतून जे उत्तम करणं शक्य होतं, ते आम्ही केलं” असं दुलत म्हणाले.

‘दुसऱ्या कुणाइतका मी सुद्धा जबाबदार’

“कुठलाही निर्णय घेतला नाही. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा आणि त्यानंतर सुद्धा मी यावर अनेकवेळा बोललोय. अमृतसरमध्ये गडबड, गोंधळाची स्थिती होती” असं दुलत म्हणाले. अपहरण झालेलं IC 814 अमृतसरमध्ये इंधन भरण्यासाठी उतरलेलं. 50 मिनिट हे विमान भारतीय भूमीवर होतं. केंद्रीय सुरक्षा एजन्सी आणि पंजाब पोलिसांना या स्थितीचा फायदा उचलता आला नाही. “आम्ही सर्व तिथे होतो. निर्णय घ्यायला पाहिजे होता. मला कोणाच नाव घ्यायच नाहीय. इतक्या वर्षांनी ते योग्य ठरणार नाही. दुसऱ्या कुणाइतका मी सुद्धा जबाबदार आहे” असं दुलत म्हणाले.

Follow Us
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.