AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Boycott Maldives | त्यावेळी थेंब-थेंब पाण्यासाठी तरसलेला मालदीव, असे कसे भारताचे सगळे उपकार विसरला?

Boycott Maldives | भारत एकदा नाही अनेकदा संकटकाळात मालदीवच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहिलाय. पण आज मालदीव हे सगळ विसरुन चीनच्या मागे पळतोय. मालदीवला येणाऱ्या दिवसात मोठा फटका बसू शकतो. कारण मालदीवला भारताची नाराजी परवडणारी नाही. ऑपरेशन नीर, ऑपरेशन संजीवनी मालदीव आज सगळच विसरलाय.

Boycott Maldives | त्यावेळी थेंब-थेंब पाण्यासाठी तरसलेला मालदीव, असे कसे भारताचे सगळे उपकार विसरला?
operation neer
| Updated on: Jan 08, 2024 | 2:01 PM
Share

Boycott Maldives | आधी मालदीवमधून भारतीय सैन्य हटवण्याचा मुद्दा त्यानंतर पंतप्रधान मोदींबद्दल तिथल्या मंत्र्यांच वादग्रस्त वक्तव्य. भारत आणि मालदीवमधील संबंध बिघडत चालले आहेत. राष्ट्रपति मोहम्मद मोइज्जू हे दोन्ही देशांमधील संबंध बिघडण्याच कारण आहे. त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत इंडिया आऊट हा भारतविरोधी नारा दिला होता. चीनच्या बाजूला मोहम्मद मोइज्जू यांचा जास्त कल आहे. पण मालदीववर जेव्हा-जेव्हा संकट आलं, तेव्हा-तेव्हा भारताच पाठिशी उभा राहिला होता. वर्ष 2014 मधील ‘ऑपरेशन नीर’ त्याच एक उत्तम उदहारण आहे. 2014 मध्ये मालदीवमध्ये पाणी संकट निर्माण झालं होतं. त्यावेळी मालदीवला भारताकडे मदत मागावी लागली. भारत सरकारने मालदीवला त्या संकटातून बाहेर काढलं होतं. जाणून घ्या काय होतं हे ऑपरेशन नीर आणि भारताने केव्हा-केव्हा मालदीवची मदत केलीय?

मालदीवची राजधानी मालेमध्ये आरओ प्लांट खराब झाल्याने पाणी संकट निर्माण झालं होतं. संपूर्ण शहर पाण्याच्या एक थेंबासाठी तरसत होतं. त्यावेळी मालदीवने भारत सरकारकडे मदत मागितली. सुषमा स्वराज त्यावेळी भारताच्या परराष्ट्र मंत्री होत्या. परराष्ट्र सचिव जयशंकर होते. सुषमा स्वराज गरजवंतांना तात्काळ मदत करायच्या. मालदीवच्या विषयातही त्यांनी तात्काळ मदत पाठवण्याच आश्वासन दिलं होतं. त्या पीएम मोदींशी बोलल्या व लगेच मदत पाठवण्याचा निर्णय झाला.

इंडियन एअरफोर्सने काय केलं?

इंडियन एअरफोर्सच्या ऑफिशियल वेबसाइटनुसार, माले शहराला रोज 100 टी पिण्याच्या पाण्याची आवश्यकता होती. इंडियन एअर फोर्सवर मदत पोहोचवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या तीन तीन सी-17 आणि तीन आय एल-76 विमानांची तैनाती करण्यात आली. पॅक केलेल पाणी दिल्लीच्या अराक्कोणम येथून मालेला पाठवण्यात आलं. एअरफोर्सच्या विमानांनी 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान 374 टन पिण्याच पाणी तिथे पोहोचवलं. ऑपरेशन संजीवनी

फक्त ऑपरेशन नीरच नाही भारताने अनेक प्रसंगात मालदीवची मदत केलीय. कोविड दरम्यान भारताने ऑपरेशन संजीवनी मोहिम चालवली. मालदीव सरकारच्या विनंतीवरुन भारताने C-130J विमानातून औषध आणि उपचार सामुग्री तिथे पोहोचवली. इतकच नाही, भारतीय सैन्याने वायरल टेस्ट लॅब बनवण्यासाठी 14 सदस्यीय मेडिकल पथक मालदीवला पाठवलं. भारत सरकारने 5.5 टन आवश्यक औषध मालदीवला दिली.

Follow Us
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती