AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Boycott Maldives | त्यावेळी थेंब-थेंब पाण्यासाठी तरसलेला मालदीव, असे कसे भारताचे सगळे उपकार विसरला?

Boycott Maldives | भारत एकदा नाही अनेकदा संकटकाळात मालदीवच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहिलाय. पण आज मालदीव हे सगळ विसरुन चीनच्या मागे पळतोय. मालदीवला येणाऱ्या दिवसात मोठा फटका बसू शकतो. कारण मालदीवला भारताची नाराजी परवडणारी नाही. ऑपरेशन नीर, ऑपरेशन संजीवनी मालदीव आज सगळच विसरलाय.

Boycott Maldives | त्यावेळी थेंब-थेंब पाण्यासाठी तरसलेला मालदीव, असे कसे भारताचे सगळे उपकार विसरला?
operation neer
| Updated on: Jan 08, 2024 | 2:01 PM
Share

Boycott Maldives | आधी मालदीवमधून भारतीय सैन्य हटवण्याचा मुद्दा त्यानंतर पंतप्रधान मोदींबद्दल तिथल्या मंत्र्यांच वादग्रस्त वक्तव्य. भारत आणि मालदीवमधील संबंध बिघडत चालले आहेत. राष्ट्रपति मोहम्मद मोइज्जू हे दोन्ही देशांमधील संबंध बिघडण्याच कारण आहे. त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत इंडिया आऊट हा भारतविरोधी नारा दिला होता. चीनच्या बाजूला मोहम्मद मोइज्जू यांचा जास्त कल आहे. पण मालदीववर जेव्हा-जेव्हा संकट आलं, तेव्हा-तेव्हा भारताच पाठिशी उभा राहिला होता. वर्ष 2014 मधील ‘ऑपरेशन नीर’ त्याच एक उत्तम उदहारण आहे. 2014 मध्ये मालदीवमध्ये पाणी संकट निर्माण झालं होतं. त्यावेळी मालदीवला भारताकडे मदत मागावी लागली. भारत सरकारने मालदीवला त्या संकटातून बाहेर काढलं होतं. जाणून घ्या काय होतं हे ऑपरेशन नीर आणि भारताने केव्हा-केव्हा मालदीवची मदत केलीय?

मालदीवची राजधानी मालेमध्ये आरओ प्लांट खराब झाल्याने पाणी संकट निर्माण झालं होतं. संपूर्ण शहर पाण्याच्या एक थेंबासाठी तरसत होतं. त्यावेळी मालदीवने भारत सरकारकडे मदत मागितली. सुषमा स्वराज त्यावेळी भारताच्या परराष्ट्र मंत्री होत्या. परराष्ट्र सचिव जयशंकर होते. सुषमा स्वराज गरजवंतांना तात्काळ मदत करायच्या. मालदीवच्या विषयातही त्यांनी तात्काळ मदत पाठवण्याच आश्वासन दिलं होतं. त्या पीएम मोदींशी बोलल्या व लगेच मदत पाठवण्याचा निर्णय झाला.

इंडियन एअरफोर्सने काय केलं?

इंडियन एअरफोर्सच्या ऑफिशियल वेबसाइटनुसार, माले शहराला रोज 100 टी पिण्याच्या पाण्याची आवश्यकता होती. इंडियन एअर फोर्सवर मदत पोहोचवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या तीन तीन सी-17 आणि तीन आय एल-76 विमानांची तैनाती करण्यात आली. पॅक केलेल पाणी दिल्लीच्या अराक्कोणम येथून मालेला पाठवण्यात आलं. एअरफोर्सच्या विमानांनी 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान 374 टन पिण्याच पाणी तिथे पोहोचवलं. ऑपरेशन संजीवनी

फक्त ऑपरेशन नीरच नाही भारताने अनेक प्रसंगात मालदीवची मदत केलीय. कोविड दरम्यान भारताने ऑपरेशन संजीवनी मोहिम चालवली. मालदीव सरकारच्या विनंतीवरुन भारताने C-130J विमानातून औषध आणि उपचार सामुग्री तिथे पोहोचवली. इतकच नाही, भारतीय सैन्याने वायरल टेस्ट लॅब बनवण्यासाठी 14 सदस्यीय मेडिकल पथक मालदीवला पाठवलं. भारत सरकारने 5.5 टन आवश्यक औषध मालदीवला दिली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.