AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Boycott Maldives | त्यावेळी थेंब-थेंब पाण्यासाठी तरसलेला मालदीव, असे कसे भारताचे सगळे उपकार विसरला?

Boycott Maldives | भारत एकदा नाही अनेकदा संकटकाळात मालदीवच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहिलाय. पण आज मालदीव हे सगळ विसरुन चीनच्या मागे पळतोय. मालदीवला येणाऱ्या दिवसात मोठा फटका बसू शकतो. कारण मालदीवला भारताची नाराजी परवडणारी नाही. ऑपरेशन नीर, ऑपरेशन संजीवनी मालदीव आज सगळच विसरलाय.

Boycott Maldives | त्यावेळी थेंब-थेंब पाण्यासाठी तरसलेला मालदीव, असे कसे भारताचे सगळे उपकार विसरला?
operation neer
| Updated on: Jan 08, 2024 | 2:01 PM
Share

Boycott Maldives | आधी मालदीवमधून भारतीय सैन्य हटवण्याचा मुद्दा त्यानंतर पंतप्रधान मोदींबद्दल तिथल्या मंत्र्यांच वादग्रस्त वक्तव्य. भारत आणि मालदीवमधील संबंध बिघडत चालले आहेत. राष्ट्रपति मोहम्मद मोइज्जू हे दोन्ही देशांमधील संबंध बिघडण्याच कारण आहे. त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत इंडिया आऊट हा भारतविरोधी नारा दिला होता. चीनच्या बाजूला मोहम्मद मोइज्जू यांचा जास्त कल आहे. पण मालदीववर जेव्हा-जेव्हा संकट आलं, तेव्हा-तेव्हा भारताच पाठिशी उभा राहिला होता. वर्ष 2014 मधील ‘ऑपरेशन नीर’ त्याच एक उत्तम उदहारण आहे. 2014 मध्ये मालदीवमध्ये पाणी संकट निर्माण झालं होतं. त्यावेळी मालदीवला भारताकडे मदत मागावी लागली. भारत सरकारने मालदीवला त्या संकटातून बाहेर काढलं होतं. जाणून घ्या काय होतं हे ऑपरेशन नीर आणि भारताने केव्हा-केव्हा मालदीवची मदत केलीय?

मालदीवची राजधानी मालेमध्ये आरओ प्लांट खराब झाल्याने पाणी संकट निर्माण झालं होतं. संपूर्ण शहर पाण्याच्या एक थेंबासाठी तरसत होतं. त्यावेळी मालदीवने भारत सरकारकडे मदत मागितली. सुषमा स्वराज त्यावेळी भारताच्या परराष्ट्र मंत्री होत्या. परराष्ट्र सचिव जयशंकर होते. सुषमा स्वराज गरजवंतांना तात्काळ मदत करायच्या. मालदीवच्या विषयातही त्यांनी तात्काळ मदत पाठवण्याच आश्वासन दिलं होतं. त्या पीएम मोदींशी बोलल्या व लगेच मदत पाठवण्याचा निर्णय झाला.

इंडियन एअरफोर्सने काय केलं?

इंडियन एअरफोर्सच्या ऑफिशियल वेबसाइटनुसार, माले शहराला रोज 100 टी पिण्याच्या पाण्याची आवश्यकता होती. इंडियन एअर फोर्सवर मदत पोहोचवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या तीन तीन सी-17 आणि तीन आय एल-76 विमानांची तैनाती करण्यात आली. पॅक केलेल पाणी दिल्लीच्या अराक्कोणम येथून मालेला पाठवण्यात आलं. एअरफोर्सच्या विमानांनी 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान 374 टन पिण्याच पाणी तिथे पोहोचवलं. ऑपरेशन संजीवनी

फक्त ऑपरेशन नीरच नाही भारताने अनेक प्रसंगात मालदीवची मदत केलीय. कोविड दरम्यान भारताने ऑपरेशन संजीवनी मोहिम चालवली. मालदीव सरकारच्या विनंतीवरुन भारताने C-130J विमानातून औषध आणि उपचार सामुग्री तिथे पोहोचवली. इतकच नाही, भारतीय सैन्याने वायरल टेस्ट लॅब बनवण्यासाठी 14 सदस्यीय मेडिकल पथक मालदीवला पाठवलं. भारत सरकारने 5.5 टन आवश्यक औषध मालदीवला दिली.

अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!.
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष.
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना.
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.