AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Boycott Maldives | मालदीवची लोकसंख्या किती लाख? भारत कि,चीन कोणाच्या आधारावर उभा आहे हा छोटासा देश?

Boycott Maldives | मालदीवच्या मंत्र्यांनी भारतीय पंतप्रधानांबद्दल टिप्पणी करुन आपल्याच पायावर कुऱ्हाड मारली आहे. हे सगळ असच झालेलं नाही. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू चीनच्या हातात खेळतायत. मालदीवमध्ये भारतीय सैन्य आहे, त्यांनी त्या विरोधात इंडिया आऊटचा निवडणूक प्रचारात नारा दिला होता.

Boycott Maldives | मालदीवची लोकसंख्या किती लाख? भारत कि,चीन कोणाच्या आधारावर उभा आहे हा छोटासा देश?
india vs maldives
| Updated on: Jan 08, 2024 | 1:28 PM
Share

Boycott Maldives | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या आठवड्याच्या सुरुवातीला लक्षद्वीपला भेट दिली. त्यानंतर मालदीव सरकारमधील मंत्री मरियम शिउना आणि दुसऱ्या नेत्यांनी काही आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यावरुन दोन्ही देशांमध्ये मोठा वाद सुरु आहे. सोशल मीडियावर #ExploreIndianIslands आणि #BycottMaldives ट्रेंड सुरु आहे. वाद वाढत गेल्यानंतर मालदीव सरकार लगेचच बॅकफूटवर गेले. मंत्र्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही हे सांगत, तीन मंत्र्यांना तात्काळ निलंबित केलं. मालदीवमध्ये नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर दोन्ही देशातील राजकीय संबंधित अनिश्चितता वाढली आहे. चीनच्या बाजूला जास्त कल असलेले मालदीवचे नवीन राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी निवडणूक प्रचारात ‘इंडिया आऊट’ कॅम्पेनचा नारा दिला होता. त्याआधीचे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांची निती ‘इंडिया फर्स्ट’ची होती. मुइज्जू सत्तेवर आल्यापासून भारत आणि मालदीवमधील संबंध बिघडत चालले आहेत.

भारत आणि मालदीवमध्ये दोन हजार किलोमीटरच अंतर आहे. भारत मालदीवचा जवळचा शेजारी आहे. मालदीवच्या लोकसंख्येबद्दल बोलायच झाल्यास हिंद महासागर क्षेत्रात या देशाची लोकसंख्या 5 लाखाच्या घरात आहे. मालदीवमध्ये 1000 पेक्षा जास्त छोटी बेट आहेत. लोक इथे सुट्टया एन्जॉय करण्यासाठी येतात. मालदीवच समुद्रासह एकूण क्षेत्रफळ 90,000 वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेलं आहे. आशिया खंडातील हा छोटासा देश आहे. इथे बहुसंख्य मुस्लिम लोकसंख्या वास्तव्याला आहे. भारत आणि मालदीवमध्ये प्राचीन संबंध आहेत. 1965 साली मालदीवल स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर मालदीवशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करणारा भारत जगातील पहिला देश होता.

हाच भारत आणि चीनमधला फरक

भारताने मालदीवला नेहमीच मोठी आर्थिक मदत केलीय. हुकुरु मिस्की रिनोवेशन, उच्च प्रभाव सामुदायिक विकास योजना आणि अन्य द्निपक्षीय योजनांचा समावेश आहे. भारताने निस्वार्थ भावनेतून मालदीवला मदत केली. दुसऱ्याबाजूला चीनने सुद्धा मालदीवमध्ये योजना सुरु केल्या. त्यांना भरपूर कर्ज दिलं व त्या देशात कर्जात बुडवलं.

दोन्ही देशांमध्ये आयात-निर्यात किती?

व्यापारी दृष्टीकोनातून बघायच झाल्यास दरवर्षी भारत आणि मालदीवमध्ये व्यापार वाढत चाललाय. 2023 मध्ये भारताने मालदीवला 41.02 कोटी डॉलर सामानाची निर्यात केली. तेच 61.09 लाख डॉलर सामानाची आयात केली. 2022 मध्ये निर्यातीचा आकडा 49.54 कोटी डॉलर आणि आयातीचा आकडा 61.9 लाख डॉलरचा होता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.