RSS Mohan Bhagwat : संघ प्रमुख मोहन भागवत यांच्या उपस्थितीत आज संघ परिवाराची महत्वाची बैठक

RSS Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत आजपासून संघ परिवाराची महत्वाची बैठक होणार आहे. मंगळवारी विज्ञान विहार येथे आयोजित प्रेस ब्रीफिंग मध्ये संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ही माहिती दिली.

RSS Mohan Bhagwat : संघ प्रमुख मोहन भागवत यांच्या उपस्थितीत आज संघ परिवाराची महत्वाची बैठक
Rss Leaders
| Updated on: Aug 19, 2026 | 8:34 AM

विशाखापट्टणम जवळ असलेल्या गुडिलोवा ‘विज्ञान विहार’ विद्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ‘अखिल भारतीय समन्वय बैठक’होणार आहे. 19 ऑगस्ट म्हणजे आज सकाळी 9 वाजल्यापासून ते 21 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत या बैठकींचं सत्र चालणार आहे. मंगळवारी विज्ञान विहार येथे आयोजित प्रेस ब्रीफिंग मध्ये संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ही माहिती दिली. दरवर्षी अखिल भारतीय समन्वय बैठक आोयजित करण्यात येते. यात संघाच्या प्रेरणेने कार्य करणाऱ्या एकूण 32 संघटनाचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, सर्व सह सरकार्यवाह आणि अन्य केंद्रीय अधिकारी उपस्थित राहतील. समन्वय बैठकीत संघाच्या प्रेरणेने कार्य करणाऱ्या भारतीय मजदूर संघ, विश्व हिन्दू परिषद, भारतीय जनता पार्टी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय किसान संघ, राष्ट्र सेविका समितीसह अन्य राष्ट्रीय अध्यक्ष, महामंत्री, अखिल भारतीय संघटन मंत्री आणि काही निवडक कार्यकर्ते या बैठकीत सहभागी होतील. विविध संघटनांच्या 49 महिलांसह एकूण 253 प्रमुख कार्यकर्ते आणि संघाचे पदाधिकारी मिळून एकूण 327 प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

कुठले निर्णय घेणारी ही बैठक नसल्याचं सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केलं. समाजिक हितासाठी कार्यरत असणाऱ्या विभिन्न संघटनांमध्ये समन्वय, त्यांचे अनूभव जाणून घेणं, परस्पर समन्वय सुधारणा यावर चर्चा होईल. देशाची वर्तमान स्थिती, सामाजिक परिवर्तन आणि समस्यांचं निराकरण कसं करता येईल यावर मंथन होईल. लोकसंख्याविषयक असंतुलन डेमोग्राफिक बदलाचे परिणाम यावर बैठकीत चर्चा होईल. युवकांना व्यसन मुक्तीपासून दूर ठेवण्यासाठी काय उपायोजना करता येतील, यावर सुद्धा चर्चा होईल. नशा मुक्तीसह युवकांध्ये जनजागृती यावर मंथन होईल.

या विषयांना कसं पुढे न्यायाचं

संघाच्या शताब्दी वर्षावेळी ‘पंच परिवर्तन’ ठरवण्यात आलेलं, त्यावरही चर्चा होईल. सामाजिक समरसता, पर्यावरण अनुकूल जीवनशैली, कुटुंब प्रबोधन (कौटुंबिक मूल्य), ‘स्व’ का भाव (स्वदेशी / स्व-जागरण), नागरिक कर्तव्यांचे पालन या विषयांवर चर्चा होईल. संघाचे स्वयंसेवक आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पंच परिवर्तन प्रयत्न आरंभ केले आहेत. शताब्दी वर्ष पूर्ण झाल्यानंतर या विषयांना कसं पुढे न्यायाचं आहे, तसचं विविध संघटनांच्या भूमिकांवर चर्चा होईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us