Mohan Bhagwat: तर Gen Z ओझं ठरतील…तरुणांबद्दल RSSचं सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान चर्चेत
Mohan Bhagwat RSS: स्वातंत्र्य दिनानिमित्त आज नागपूरमध्ये आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विद्यार्थी आणि 'Gen-Z' यांच्याशी संवाद साधला. या संवादादरम्यान, भागवत यांनी तरुणांना राष्ट्राची सर्वात मोठी शक्ती म्हटले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त आज नागपूरमध्ये आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विद्यार्थी आणि ‘Gen-Z’ यांच्याशी संवाद साधला. या संवादादरम्यान, भागवत यांनी तरुणांना राष्ट्राची सर्वात मोठी शक्ती म्हटले. त्यांनी सांगितले की, भारतातील तरुण हे ‘Demographic Dividend आहेत आणि जर त्यांना योग्य दिशा, मार्गदर्शन आणि संधी मिळाल्या, तर ते राष्ट्रीय संपत्ती बनू शकतात. त्यांनी असा इशाराही दिला की, जर असे केले नाही, तर हेच तरुण समाजावर ओझे बनू शकतात. भागवत यांनी तरुणांना राष्ट्र आणि समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी समजून घेण्याचे आणि भावी पिढीचा विचार करण्याचे आवाहन केले. त्यांनी देशाची विविधता, संविधान आणि कायदा यांचे पालन करत समाजात एकता टिकवून ठेवण्याच्या महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले की, देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे आणि मतभेद टाळले पाहिजेत.
मोहन भागवत काय म्हणाले?
नागपूरमधील कस्तुरचंद पार्क येथे ध्वजारोहण समारंभात मोहन भागवत पुढे म्हणाले की, आजची तरुण पिढी सुमारे 30 वर्षांत वृद्ध पिढी बनेल आणि त्यांना पुढच्या पिढीची काळजी घ्यावी लागेल व त्यांच्याबद्दल विचारशील राहावे लागेल. मोहन भागवत यांनी देशातील कायद्यावरही आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, आपला देश खूप मोठा देश आहे. त्यात सर्व प्रकारची विविधता आहे. देशाच्या कायद्यांनी संविधानाला हानी पोहोचवू नये. आपल्या प्राचीन आणि पवित्र संस्कृतीला धक्का पोहोचू नये. आपल्या नैतिक शक्तीला धक्का पोहोचू नये. म्हणूनच त्याला एक मर्यादा आहे. त्या मर्यादांच्या भोवती एक वर्तुळ आहे, जे मर्यादेत राहणाऱ्यांची खात्री करते आणि म्हणूनच हे धम्मचक्र आहे.”
ते पुढे म्हणाले, “देशाच्या विकासासाठी आपणा सर्वांना एकत्र काम करावे लागेल. आपणा सर्वांना एकत्र पुढे जायचे आहे. आपण कधीही वेगळे होता कामा नये.” आपल्यामध्ये कोणतीही फूट पडता कामा नये. आपण आपले भविष्य, आपल्या देशाचे भविष्य घडवू. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, भविष्य केवळ एका व्यक्तीमुळे घडत नाही. अगदी कुटुंबाचे भविष्यसुद्धा घडवले जात नाही. जर आपल्याला जगात सुरक्षितता आणि आदर हवा असेल, तर तो आपल्याला तोपर्यंत मिळणार नाही, जोपर्यंत आपला देश आणि आपला समाज सुरक्षित आणि सन्मानित होत नाही.
