AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या त्या गोष्टीमुळे चीन झाला भलताच खूश, चायनाकडून कौतुकच कौतुक, थेट जगाला दिलं उदाहरण

अमेरिकेच्या टॅरिफनंतर भारताची रशिया आणि चीन सोबतची जवळीक वाढली आहे, भारताची चीनसोबत वाढत असलेली जवळीक अमेरिकेसाठी डोकेदुखीचा विषय बनली असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे.

भारताच्या त्या गोष्टीमुळे चीन झाला भलताच खूश, चायनाकडून कौतुकच कौतुक, थेट जगाला दिलं उदाहरण
xi jinpingImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 31, 2025 | 4:25 PM
Share

अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर अमेरिका आणि भारतामधील संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. मात्र दुसरीकडे या टॅरिफनंतर भारताची चीन आणि रशियासोबत जवळीक वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे भारताच्या दौऱ्यावर आले होते. तर त्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या दौऱ्यावर गेले होते. समोर आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या काही महिन्यांपासून भारताची चीन आणि रशियासोबत निर्यात देखील वाढली आहे. दरम्यान अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर चीनने अमेरिकेचा निषेध देखील केला होता, भारतीय वस्तूंचं आमच्या देशात स्वागत आहे, असं चीनने म्हटलं होतं. दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा चीनकडून भारताचं जोरदार कौतुक करण्यात आलं आहे. चीनच्या दूतावासाकडून एक अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये चीनने असं म्हटलं आहे की, आम्हाला हे पाहून खूप आनंद झाला, की भारत हा जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. हीच भारताची खरी ताकद आहे, असं चीनने म्हटलं आहे.

भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, भारतानं जपानला मागे टाकलं आहे, एका सरकारी प्रसिद्धी पत्रकानुसार भारताचा जीडीपी सध्या स्थितीमध्ये 4.18 ट्रिलियन अमेरीकन डॉलवर पोहोचली आहे. अमेरिका, चीन आणि जर्मनीनंतर आता भारत ही जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. दरम्यान असा देखील अंदाज लावला जात आहे की, भारत 2030 पर्यंत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. दरम्यान यावरूनच आता चीनने भारताचं जोरदार कौतुक केलं आहे.

नेमकं काय म्हटलं?

चीनच्या दूतावासातील प्रवक्त यू जिंग यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. हे ऐकून आनंद झाला की, भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. भारतानं संपूर्ण जगाला हे दाखवून दिलं आहे की, खरी ताकद ही प्रामाणिकपणाने इतिहासाचा सामना करून, त्यापासून बोध घेऊन आणि जबाबदारी घेऊन येते, असं चीनने म्हटलं आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून तैवानवरून जपान आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे, ही संधी साधून चीनने जपानला डिवचल्याचं बोललं जात आहे.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी