AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने मालदीवला दिला मोठा झटका, या शेजारील देशांसाठी मात्र उघडली तिजोरी

India maldive row : भारताशी पंगा घेणं कदाचित भविष्यात मालदीवला चांगलंच महागात पडू शकतं. एकीकडे जगात भारताचे वर्चस्व वाढत असताना मालदीवने मात्र भारतविरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे भारतही त्यांना मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. बजेटमध्ये भारताने ते दाखवून देखील दिलं आहे.

भारताने मालदीवला दिला मोठा झटका, या शेजारील देशांसाठी मात्र उघडली तिजोरी
| Updated on: Feb 02, 2024 | 8:34 PM
Share

India maldive row : गुरुवारी लोकसभेत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी बजेट सादर केलं. या अंतरिम अर्थसंकल्पात परराष्ट्र मंत्रालयाला एकूण 22,154 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. गेल्या वर्षी 18,050 कोटींची तरतूद करण्यात आली होती. भारताच्या ‘नेबरहुड फर्स्ट’ धोरणाच्या अनुषंगाने, भारत हा भूतानला 2,068 कोटी रुपयांच्या पैसे आणि वस्तूंच्या स्वरुपात मदत करणार आहे. दुसरीकडे मोदी सरकारने मालदीवला मोठा झटका दिला आहे. कारण मालदीवला दिल्या जाणाऱ्या मदतीत सरकारने 22 टक्क्यांनी कपात केली आहे.

मालदीवला मोठा झटका

अर्थसंकल्पीय कागदपत्रांनुसार, मालदीवला दिल्या जाणाऱ्या विकास निधीत भारताने २२ टक्के कपात केली आहे. गेल्या वर्षी 770 कोटींचा मदत निधी देण्यात आला होता. पण यंदा तो 600 कोटी रुपये ठेवण्यात आला आहे. भारत 2023-24 मध्ये हिमालयीन राष्ट्राच्या विकासासाठी 2,400 कोटी रुपये खर्च करणार आहे. भारताने अर्थसंकल्पात इराणशी कनेक्टिव्हिटीवर विशेष भर दिला आहे. चाबहार बंदरासाठी मोदी सरकारने 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर अफगाणिस्तानसाठी 200 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय मदत राखून ठेवली आहे.

भारताने मॉरिशससाठी 370 कोटी रुपये, म्यानमारसाठी 250 कोटी रुपये विकास सहाय्य निश्चित केले आहे. श्रीलंकेला दिल्या जाणाऱ्या मदतीत वाढ करण्यात आली आहे. श्रीलंकेला 75 कोटी रुपयांची विकास मदत मिळणार आहे. आफ्रिकन देशांसाठी 200 कोटी रुपयांची मदत राखून ठेवली आहे. लॅटिन अमेरिका आणि युरेशिया सारख्या विविध देश आणि प्रदेशांसाठी एकूण विकास सहाय्य 4,883 कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अंतरिम भाषणात भारत-पश्चिम आशिया-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEC) चा उल्लेख केला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, ‘पंतप्रधानांच्या शब्दात, कॉरिडॉर पुढील शेकडो वर्षांसाठी जागतिक व्यापाराचा आधार बनेल आणि इतिहास लक्षात ठेवेल की या कॉरिडॉरचा उगम भारतीय भूमीवर झाला आहे.’

मालदीवमध्ये सरकार बदलल्यानंतर भारताशी त्यांचे संबंध बिघडले आहे. नवं सरकार हे चीनच्या बाजुने आहे. भारत विरोधी भूमिका घेऊनचे हे सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे भारताचे संबंध येत्या काळात बिघडू शकतात.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.