AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसंख्येत भारताने टाकले चीनला मागे, आता जगात भारत नंबर वन

UNFPA : भारताने लोकसंख्येत चीनला मागे आता मागे टाकले आहे. आता भारत जगात लोकसंख्येबाबत प्रथम क्रमांकावर पोहचला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या United Nations Population Fund कडून जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भारत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश झाला आहे.

लोकसंख्येत भारताने टाकले चीनला मागे, आता जगात भारत नंबर वन
| Updated on: Apr 19, 2023 | 3:10 PM
Share

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेली बाब आता घडली आहे. भारताने लोकसंख्येत चीनला मागे टाकले आहे. आता भारत जगात लोकसंख्येबाबत प्रथम क्रमांकावर गेला आहे. भारताच्या तुलनेत चीनची लोकसंख्या 29 लाख कमी आहे. चीनची लोकसंख्या 142.57 कोटी आहे तर भारताची लोकसंख्या 142.86 कोटी आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या United Nations Population Fund कडून ही आकडेवारी जाहीर झाली आहे. जगाची लोकसंख्याही आता आठ बिलियनपेक्षा जास्त झाली आहे.

जगाची लोकसंख्या किती

युनोकडून World Population Report, 2023 जाहीर करण्यात आला आहे. यानुसार संपूर्ण जगाची लोकसंख्या आठ बिलिअनपेक्षाही अधिक झाली आहे. यात भारत आणि चीनचा सर्वात जास्त वाटा आहे. यो दोन्ही देशांत जगाच्या एकूण लोकसंख्येपेक्षा एक तृतीयांश लोक आहेत.

  • अहवालातील वैशिष्ट्ये
  • भारताचा प्रजनन दर सरासरी २.० आहे. सरासरी आर्युमान पुरुषांसाठी ७१ वय तर महिलांसाठी ७४ वय आहे.
  • २०२२ च्या आकडेवारीनुसार भारतीयांचं सरासरी आर्युमान ६९ वय होतं.
  • भारतीय लोकसंख्येत ६८ टक्के लोक १५ ते ६४ वयोगटातील
  • २० कोटींहून अधिक लोकसंख्या १५ ते २४ या तरुण वयोगटातील

चीनची लोकसंख्या घसरली

गेली अनेक वर्षे चीन देश लोकसंख्येच्याबाबतीत जगभरात अव्वल क्रमांकावर होता. परंतु, गेल्यावर्षी चीनची लोकसंख्या पहिल्यांदा घसरली. तसेच यंदाही लोकसंख्येत घसरण झालेली आहे. २०२२ मध्ये चीनची लोकसंख्या १४४.८५ कोटी होती. तर आता चीनमध्ये १४२.५७ लोकसंख्या आहे.

सरासरी वय वाढले

250 वर्षांपूर्वी माणसाचे सरासरी वय होते 28 वर्षे, ते आता 70 वर्षे झाले आहे. सध्या 30 देश असे आहेत, तिथे सरासरी वय 80 वर्ष आहे. 100 देशांत सरासरी वय 70 वर्ष आहे. आपल्या देशात हा आकडा 69.8 वर्ष आहे.

मृत्यूदरात मोठी घट

जन्म दराच्या तुलनेत घटलेला मृत्यू दर हेही महत्त्वाचे कारण आहे. 1950 पासून जन्म दर आणि मृत्यूदरात घट होताना दिसते आहे. 1950 मध्ये सरासरी 1000 जणांपैकी 20 जणांचा मृत्यू होत असे. 2020 साली हा आकडा 8 वर पोहचला आहे. 2020 साली जन्मदर 17.96टक्के आहे, तर मृत्यूदर 7.60 टक्के आहे.

बाल मृत्यू दरात घट

बाल मृत्यूंचे प्रमाण कमी झाल्यानेही लोकसंख्या वाढीत भर पडलेली आहे. 1990 साली 1000 मुलांपैकी 93 मुलांचा मृत्यू होत असे. आता ही परिस्थिती सुधारलेली आहे. 2020 साली 1000 मुलांपैकी केवळ 37 मुलांचाच मृत्यू होतो आहे. बाल मृत्यूंचे प्रमाण काही ठिकाणीच जास्त आहे. अफ्रिका खंडात ही संख्या आजही जास्त आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.