AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत-पाकिस्तान युद्धविराम, राजकीय आणि सर्वसामान्यांच्या वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रीया..

पाकिस्तानला योग्य धडा शिकवण्यासाठी हे युद्ध थांबायला नको होतं असे म्हटले आहे. तर काहींनी पाकिस्तानला या युद्धामुळे चांगला धडा मिळाला आहे. त्यामुळे युद्ध थांबलं ते बरं झालं अशा समिश्र प्रतिक्रिया जनसामान्यांनी व्यक्त केल्या आहेत.

भारत-पाकिस्तान युद्धविराम, राजकीय आणि सर्वसामान्यांच्या वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रीया..
| Updated on: May 10, 2025 | 8:56 PM
Share

पहलगामवरील अतिरेकी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर पोहचले होते. पाकिस्तानचा पहलगाम हल्ल्यात हात असल्याचे पुरावे दिल्यानंतरही पाकिस्तानने भारतावरच उलट टीका केली. त्यामुळे भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे ७ मे रोजी पाकिस्तानच्या ९ ठिकाणांवर एअर स्ट्राईक करुन पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. त्याआधी भारताने स्ट्रेटॅजिक निर्णय घेत पाकिस्तानला तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिला. सिंधु जल वाटप करारच रद्द करुन टाकत पाकिस्तानचे पुरते वांदे केले होते. पाकिस्तानने सिंधु जल वाटप करार रद्द करणे हे युद्धाचे पाऊल समजले जाईल असा इशारा दिला. त्यानंतर काल पाकिस्तानने ४०० ड्रोनद्वारे भारतातील सीमेलगतच्या गावांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बिथरलेल्या पाक सैनिकांनी सीमेवर गोळीबार केला. त्यानंतर अचानक आज सायंकाळी युद्धविराम जाहीर केला. यावर आता राजकीय वतृळातून विविध नेत्यांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान हे अण्वस्रधारी दोन देश युद्धाच्या उंबरठ्यावर पोहचले असताना अचानक शनिवारी अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांच्या डीजीएमओ यांच्यात समेट घडविण्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना यश आले आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भारत आणि पाकिस्तान युद्धविरामावर एक प्रतिक्रीया आलेली आहे. शरद पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,’भारताने कधीच दहशतवादाचा पुरस्कार केलेला नाही.‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने केवळ दहशतवादी तळांवर प्रखर आणि अचूक कारवाई केली — कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांवर वा सामान्य नागरिकांवर हल्ला करण्याचा हेतू नव्हता.ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती.

पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या कुरघोड्यांना संयमाने आणि निर्णायक उत्तर देणं ही भारताची जबाबदारी आहे आणि भारताने ती जागतिक शांततेच्या भानासह पार पाडली आहे.भारत हा नेहमीच शांततेचा आणि संवादाचा समर्थक राहिला आहे. आणि त्यादिशेने काही घडामोडी घडत असतील तर ते स्वागतार्ह आहे. मात्र दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलणं हेदेखील आंतरराष्ट्रीय समुदायाचं सामूहिक कर्तव्य आहे.शांतीच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल — हे दहशतवादाविरोधात सामूहिक लढ्याचं बळ वाढवतं. जय हिंद! पुणे

अशी पोस्ट शरद पवार यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

बाबा महाकांल यांच्या दर्शनासाठी येथे उज्जैन येथे दर्शनाला आलो आहे. बाबा महाकाल यांच्यामुळे नवीन ऊर्जा मिळत असते. खरे तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र नदी जल करारासाठी मी मुख्यमंत्री मनोज यादव यांना भेटण्यासाठी आलो होतो. त्यादरम्यान मी बाबा महाकांल यांच्या दर्शनाला आला आहे. देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन ऊर्जेने यशाची शिखरे गाठत आहे. भारत आणि पाकस्तान युद्धविरामाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांना स्थानिक प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले असता नाही. त्यांनी हा विषय मला माहीती नाही. मी प्रवासात होतो. या विषयाची नीट माहीती घेऊन मी प्रतिक्रीया देईन असे सांगितले.

सर्वसामान्य पुणेकर काय म्हणत आहेत ?

भारत पाकिस्तान युद्धाला पूर्णविराम सामान्य पुणेकरांना काय वाटतं याचा धाडोंळा घेतला असता संमिश्र प्रतिक्रीया आल्या आहेत. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने युद्ध सुरूच ठेवायला पाहिजे होतं असे बहुतांशी पुणेकरांनी म्हटले आहे.आमच्या आया बहिणीचा सिंदूर पुसणाऱ्या पाकिस्तानला योग्य धडा शिकवण्याची हीच वेळ होती असे यावेळी पुणेकरांनी म्हटले आहे.

भारत पाकिस्तानच्या सीमेवर सुरू असणाऱ्या सर्व हालचालीकडे लक्ष असणाऱ्या पुण्यातील जनसामान्यांनी पाकिस्तानला योग्य धडा शिकवण्यासाठी हे युद्ध थांबायला नको होतं असेही अनेक पुणेकरांनी म्हटले आहे. तर काही नागरिकांनी पाकिस्तानला या युद्धामुळे चांगला धडा मिळाला आहे. त्यामुळे आता युद्ध थांबलं पाहिजे अशी समिश्र प्रतिक्रिया पुणेकरांनी दिल्या आहेत.

Follow Us
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी...
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील... थरकाप उडवणारे दृश्य समोर
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद
Nashik | नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय
वालधूनी नदीला महापूर! प्राचीन अंबरनाथ शिवमंदिराकडे जणारा रस्ता बंद
वालधूनी नदीला महापूर! प्राचीन अंबरनाथ शिवमंदिराकडे जणारा रस्ता बंद