रानटीपणाचा गाठला कळस..ओलिसांचं आयुष्य दावणीला..सुटकेच्या आशेवर सहन करताहेत मरणयातना

म्यानमारच्या म्यावाडी भागात 300 पेक्षा जास्त भारतीयांना ओलीस ठेवले आहे, आणि त्यांना आता मरणयातना भोगव्या लागत आहेत.

रानटीपणाचा गाठला कळस..ओलिसांचं आयुष्य दावणीला..सुटकेच्या आशेवर सहन करताहेत मरणयातना
Follow us
| Updated on: Sep 23, 2022 | 2:04 PM

नवी दिल्लीः म्यानमारमध्ये (Myanmar) ओलीस ठेवण्यात आलेल्या भारतीयांची अवस्था आता प्रचंड वाईट अवस्था झाली आहे. सध्या म्यानमारमध्ये 300 पेक्षा जास्त भारतीयांना ओलीस (Indian citizen hostage) ठेवले गेले आहे. त्यानंतर भारत सरकारने प्रयत्न करुन त्यातील 30 लोकांना भारतात सुखरूपपणे आणण्यात आले आहे. तर सध्या अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याचे जोरदार प्रयत्न भारत सरकारकडून सुरु आहेत.

भारतीय दूतावासाकडून आणि परराष्ट्र मंत्र्यालयाकडून बुधवारी ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे की, भारतीय नागरिकांना नोकरीचे आमिष दाखवून घेऊन जाणाऱ्या कंपन्यांपासून सावध राहा.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बाग यांनी सांगितले की, आग्नेय म्यानमारच्या म्यावाडी भागात ओलिस ठेवलेल्या भारतीयांचा प्रश्न आता गंभीर आहे.

त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाला अशी माहिती समजली आहे की, थायलंडमधील आयटी कंपन्या रोजगारासाठी भारतीय लोकांची भरती करतात आणि त्यांना म्यानमारमध्ये घेऊन जातात. त्यामुळे भारतीय लोकांनी सावध राहिले पाहिजे अशा सूचना दिल्या गेल्या आहेत.

म्यानमारच्या म्यावाडी भागात 300 हून अधिक भारतीयांना ओलीस ठेवले गेले आहे. ज्या लोकांना ओलीस ठेवण्यात आले आहे, त्यामधील अनेक जण हे केरळचेच रहिवासी आहेत. थायलंडमध्ये नोकरी देण्याचे आश्वासन देऊन त्यांना सायबर गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आले आहे.

ज्या लोकांना भारत सरकारने बाहेर काढले आहे, त्यांनी सांगितले की, ओलीस ठेवण्यात आलेल्या नागरिकांच्या बातम्या आता येऊ लागल्याने त्यांना इतर ठिकाणी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ओलीत ठेवलेले भारतीय आता इतर ठिकाणी ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने सांगितले आहे की, ज्या भारतीय लोकांना ओलीस ठेवले गेले आहे त्यांच्यावर प्रचंड अत्याचार केले जात होते.

सायबर गुन्हा करण्यास नकार देत आहेत म्हणून त्यांना विजेचा धक्का दिला जात आहे. म्यानमारमध्ये श्वे कोक्को नावाचे ‘अब्ज डॉलरचे कॅसिनो आणि पर्यटन संकुल’ हे चिनी उद्योगपती शी जिजियांग यांच्या मालकीचे आहे. त्यामध्ये त्यांच्या धाकातच तिथं काम करावे लागत आहे.

ओलीस ठेवलेल्या केरळच्या एका युवकाने सांगितले की, त्या कॅम्पला उंचच उंच भिंती बांधल्या गेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी स्नायपर रायफल असलेले रक्षकही आहेत.

तिथे काम करणाऱ्यांना 16- 16 तास कोणत्याही वेतन आणि पगाराशिवाय काम करावे लागत आहे.एकीकडे हे हाल सुरु असतानाच दुसरीकडे मात्र त्यांना जेवण न देणे, बंदुकीनं मारण्याची भीती घालणे यासारख्या गोष्टींमुळे अनेक भारतीयांना मानसिक धक्का बसला आहे.

या गोष्टी त्या कोणालाही सांगूही शकत नाहीत कारण त्या ठिकाणी काम करणाऱ्यांकडून त्यांचे मोबाईल काढून घेतले गेले आहेत.

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.