AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जम्मू काश्मीरमधील सार्वजनिक इमारतींना आता शहिदांची नावं दिली जाणार, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत सरकारचं मोठं पाऊल

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा कार्यक्रम भारत सरकारचं एक मोठं पाऊल आहे. ज्यातून प्रगतीशील भारताची 75 वर्ष आणि या काळात लोकांनी मिळवलेलं यशाचा गौरव आहे.

जम्मू काश्मीरमधील सार्वजनिक इमारतींना आता शहिदांची नावं दिली जाणार, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत सरकारचं मोठं पाऊल
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत जम्मू काश्मीरमधील इमारतींची नावं शहिदांच्या नावावर ठेवली जाणार आहे.
| Edited By: | Updated on: Oct 29, 2021 | 3:18 PM
Share

जम्मू आणि काश्मीरमधील सार्वजनिक इमारतींना आता देशासाठी शहिद झालेल्या जवानांची आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावं दिली जाणार आहेत. जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने गुरुवारी यासाठी मान्यता दिली आहे. देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचा हा भाग असणार आहे. .यावेळी एका प्रवक्त्यांनी सांगितले की, “लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय परिषदेने शाळा, रस्ते आणि इमारतींची नावं शहीद आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावावर ठेवण्यास मान्यता दिली. हा ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ उपक्रमाचा भाग आहे. (Jammu kashmir govt to name several schools roads and government buildings after those who lost their lives for the nation aajadi ka amrut mahotsav)

या बैठकीत उप राज्यपालांचे सल्लागार फारुख खान आणि राजीव राय भटनागर, जम्मू आणि काश्मीरचे मुख्य सचिव अरुणकुमार मेहता आणि उप राज्यपालांचे प्रधान सचिव नितीश्वर कुमार उपस्थित होते. जम्मू आणि काश्मीर सरकारने सांगितले की, “केंद्रशासित प्रदेशाच्या सुरक्षा आणि विकासासाठी ज्यांनी बहुमोल योगदान दिलं आहे, त्यांचा आदर आणि सन्मान म्हणून, अनेक पायाभूत सुविधांना राष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या लोकांची नावं देण्यात येतील.”

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा कार्यक्रम भारत सरकारचं एक मोठं पाऊल आहे. ज्यातून प्रगतीशील भारताची 75 वर्ष आणि या काळात लोकांनी मिळवलेलं यशाचा गौरव आहे. हा महोत्सव भारतातील लोकांना समर्पित आहे, ज्यांनी केवळ भारताला विकासाच्या मुख्य प्रवासात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हेच नाही तर पंतप्रधान मोदींच्या भारत 2.0 च्या या स्वप्नाला साकार बनवण्यासाठी मोलाचा वाटा उचलला आहे. जे लोक आत्मनिर्भर भारताच्या भावनेने प्रेरित आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भारताच्या सामाजिक-सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक अस्मितेशी जोडलेला आहे. “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” चा अधिकृत प्रवास 12 मार्च 2021 रोजी सुरू झाला होता तो 15 ऑगस्ट 2023 पर्यंत असणार आहे.

हेही पाहा:

Pm Narendra Modi | G20 शिखर संमेलनासाठी नरेंद्र मोदी रोमला रवाना, 12 वर्षांत पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानांचा दौरा

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....