AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केरळात 40 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली; 15 जणांचा बुडून मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता…

अपघात झाला तेव्हा बोट किनाऱ्यापासून सुमारे 300 मीटर दूर होती. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीत बसलेले लोक मलप्पुरमच्या परप्पनगडी आणि तनूर भागातून आले होते.

केरळात 40 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली; 15 जणांचा बुडून मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता...
| Updated on: May 08, 2023 | 12:44 AM
Share

मलप्पुरम : केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात प्रवाशांनी घेऊन जाणारी बोट नदीत उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या बोटीत सुमारे 40 लोक प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. दुर्घटना घडल्यानंतर समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले आहे. तर अनेक लोकं अजूनही नदीत बेपत्ता असल्याचेही सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच बचाव आणि मदत पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत. नदीत बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

पुरपुझा नदीवरील थुवल थेराम पर्यटनस्थळावर सायंकाळी सातच्या सुमारास पर्यटकांनी भरलेली बोट उलटली. पर्यटकांसोबत अनेक मुले या बोटीत चढल्यामुळे ही बोट बुडल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनास्थळी बचाव पथकाशिवाय अनेक मच्छिमार आणि स्थानिक लोकही बचाव कार्यामध्ये सहभागी झाले आहेत. नदीतून 10 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

केरळचे मंत्री व्ही. अब्दुररहिमन यांनी 15 जणांचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. 15 जणांमध्ये 4 मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

स्थानिकांनी दिलेल्या महितीनुसार, बोटीमध्ये प्रमाणाच्या बाहेर लोकं भरलेली होती, त्यामले बोट लोकांसह बुडाल्याचे सांगण्यात आले आहे.

ही घटना घडल्यानंतर बोटीतील नागरिकांना वाचवण्यासाठी कोणतीच यंत्रणा नसल्याने अनेकांचा जीव गेल्याचेही सांगण्यात येत आहे.

अपघात झाला तेव्हा बोट किनाऱ्यापासून सुमारे 300 मीटर दूर होती. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीत बसलेले लोक मलप्पुरमच्या परप्पनगडी आणि तनूर भागातून आले होते. येथे प्रवासी बोटींना संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच चालवण्याची परवानगी देण्यात आली होती.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.