AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Canada Tension : कॅनडाच्या रस्त्यावर खुलेआम भारतविरोधी कारवाया, भारताने स्पष्ट शब्दात सांगितलं, की…

India Canada Tension : मागच्यावर्षी भारत-कॅनडा संबंधात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो यांनी भारतावर गंभीर आरोप केले होते. भारताने सुद्धा लगेच त्याला प्रत्युत्तर दिलं होतं. आता पुन्हा एकदा नव्याने वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे. त्याला कारण आहे, कॅनडा सरकारची मूकसंमती.

India Canada Tension : कॅनडाच्या रस्त्यावर खुलेआम भारतविरोधी कारवाया, भारताने स्पष्ट शब्दात सांगितलं, की...
PM Modi-Trudeau
| Updated on: May 08, 2024 | 8:09 AM
Share

मागच्यावर्षीपासून भारत-कॅनडामधील द्विपक्षीय संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. आता कुठे गाडी हळूहळू रुळावर येत आहे, असं वाटत असतानाच भारत-कॅनडामध्ये नव्याने वाद उफाळून येण्याची चिन्ह आहेत. कॅनडामध्ये खुलेआम भारत विरोधी कृत्य सुरु आहेत. कॅनडातून समोर आलेल्या एका वादग्रस्त फोटोवर भारताने आक्षेप नोंदवलाय. हिंसेच्या सेलिब्रेशनला आणि उदात्तीकरणाला परवानगी दिल्याचा कॅनडा सरकारवर आरोप आहे. कॅनडाने कट्टरपंथीयांना आश्रय देणं बंद करावं, हिंसेच उदात्तीकरण कुठल्याही सभ्य समाजाचा भाग असू शकत नाही, असं भारताने ट्रूडो सरकारला स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. ओंटारियोच्या माल्टनमध्ये वादग्रस्त आणि खलिस्तान समर्थनाच्या चित्ररथाची मिरवणूक काढली होती. यावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले की, “भारताला कॅनडामधील आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेची चिंता वाटते. भयमुक्त वातावरणात त्यांना काम करायला मिळेल, अशी आम्हाला कॅनडाकडून अपेक्षा आहे”

“कॅनडामधील कट्टरपंथीय आमच्या राजकीय नेतृत्वाविरोधात हिंसक फोटोंचा वापर करतायत, त्यावर आम्ही वारंवार चिंता व्यक्त केली आहे. मागच्यावर्षी आमच्या माजी पंतप्रधानांच्या हत्येचा संदर्भ असलेल्या एक चित्ररथाची मिरवणूक काढण्यात आली होती” असं रणधीर जैस्वाल म्हणाले. “कॅनडामध्ये भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांचे पोस्टर लावून त्यांच्याविरोधात हिंसाचार करण्याची धमकी देण्यात आली आहे. हिंसेच सेलिब्रेशन आणि उदात्तीकरण कुठल्याही सभ्य समाजाचा भाग असू शकत नाही” असं रणधीर जैस्वाल म्हणाले.

भारताने काय म्हटलय?

“लोकशाहीप्रधान देशांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर अशा कट्टरपंथीय तत्वांना परवानगी देऊ नये” असं रणधीर जैस्वाल म्हणाले. मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो यांनी खलिस्तानी फुटीरतावादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्या प्रकरणात भारतीय एजंट सहभागी असल्याचा आरोप केला होता.

तीन भारतीयांना अटक

त्यानंतर भारत आणि कॅनडाच्या व्दिपक्षीय संबंधात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. भारताने ट्रूडो यांचे आरोप फेटाळून लावले होते. मागच्या आठवड्यात कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी तीन भारतीय नागरिकांवर निज्जरच्या हत्येचा आरोप लावला. हे तिघेही विद्यार्थी विजावर कॅनडाला गेले आहेत.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा