AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीज पडून 10 जणांचा मृत्यू, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

ऑगस्ट महिन्यात गायब झालेला पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. पुढच्या चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असल्याच घरातून बाहेर पडावे.

वीज पडून 10 जणांचा मृत्यू, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा
odisa news in marathiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 03, 2023 | 12:18 PM
Share

नवी दिल्ली : ओडिसा (Odisa) राज्यात सहा जिल्ह्यात वीज पडून दहा जणांचा मृत्यू झाला आहे. काल ओडिसा (odisa news in marathi) जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाला आहे. काल तिथल्या राज्यातील प्रशासनाने वीज पडून खुर्दा जिह्यात चार, बोलांगीर जिल्ह्यात दोन, अंगुल, बौध, जगतसिंहपुर आणि ढेंकनाल या जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर खुर्दा (khurda) जिल्ह्यात आणखी तीन लोक जखमी झाले आहेत.

ओडिसा राज्यात काल मुसळधार पाऊस झाला आहे, भुवनेश्वर आणि कटक या शहरात अतिवृष्टी झाली आहे. भारतीय हवामान खात्याने पुढच्या चार दिवसात अतिवृष्टी होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी जाहीर केलं आहे की, त्या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता आहे. भुवनेश्वर आणि कटक या भागात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून गरज असल्यास बाहेर पडावे असं आवाहन केलं आहे.

ज्यावेळी राज्यात कुठेही पावसाची शक्यता असेल त्यावेळी लोकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे, तिथल्या प्रादेशिक हवामान केंद्राचे संचालक एचआर बिस्वास यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले की, ईशान्य बंगालच्या उपसागरातही एक चक्री चक्रीवादळ तयार झाले आहे. त्याचबरोबर आणखी एक वादळ तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचे चार दिवस कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचे संकेत मिळाले आहेत.

देशात अनेक राज्यात पुन्हा पाऊस सुरु झाला आहे. मागच्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात चांगला पाऊस सुरु झाला आहे. हवामान खात्याने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशात कमी पाऊस होईल असं जाहीर केलं होतं.

अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!.
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष.
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना.
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.