AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाशिवाय एकत्र राहातात, मुलांना जन्म घालतात, काय आहे परंपरा ?

लिव्ह इन रिलेशनशिपच्या नावाने आजही शहरातील काही मंडळी नाक मुरडत असतात.परंतू देशात एका ठिकाणी अनेक वर्षांपासून लग्न न करता एकत्र राहाण्याची आणि मुलं जन्माला घालण्याची प्रथा आहे.

लग्नाशिवाय एकत्र राहातात, मुलांना जन्म घालतात, काय आहे परंपरा ?
| Updated on: Nov 06, 2024 | 3:20 PM
Share

मुंबई आणि दिल्लीत सारख्या शहरात लग्नाआधी एका घरात लिव्ह – इन रिलेशनशिपमध्ये राहाणे सर्वसामान्य म्हटले जाते. परंतू छोट्या शहरात यास अजूनही मोठा गुन्हा मानलं जाते.गावात अशा प्रकारच्या रिलेशन शिपला मोठा विरोध होत असतो. अशात भारतात असे एक जिल्हा आहे. जेथे लिव्ह इन रिलेशनशिप ही सामान्य गोष्ट आहे. राजस्थान आणि गुजरात राहणाऱ्या गरासिया जमातीत ही परंपरा आहे. या जमातीत पुरुष आणि महिला विवाहा शिवाय एकत्र राहू शकतात. तसेच महिला लग्ना आधी मुलंही जन्माला घालू शकतात. महिलांना आपला आवडता वर निवडण्याचा अधिकार आहे.त्यामुळे जमात प्रगत मानली जाते.

येथे विवाहासाठी दोन दिवसांच्या मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यात मुले आणि मुली एकत्र येतात. जर ते कोणाला पसंत करत असतील मेळाव्यातून एकत्र पळून जातात. त्यानंतर ते लग्न न करता एकत्र राहातात.त्यानंतर मुलांनाही जन्माला घालतात.त्यानंतर ते आपल्या गावी जातात आणि मग त्यांचा विवाह धुमधडाक्यात केला जातो.

या समाजात लिव्ह-इन मध्ये रहाण्याची ही प्रथा शेकडो वर्षांची आहे.अशी मान्यता आहे की जातीचे चार भाऊ गाव सोडून गेले होते.आणि राहू लागले होते. तिघांनी परंपरेनुसार लग्न केले. तर एक भाऊ लग्न न करताच मुलीसोबत राहु लागला.त्या तीन भावांना मुल झाले नाही. परंतू लग्न न करता राहणाऱ्या मुल झाले त्यानंतर ही प्रथा सुरु झाली.

गरासिया महिलांना जर वाटले तर आधीच पार्टनर असतानाही मेळाव्यात दुसरा पार्टनर निवडू शकतात. अशा प्रकारचे स्वातंत्र्य आधुनिक समाजात देखील मिळत नाही.यामुळे ही जमात जगभर प्रसिद्ध आहे. भारतात आणखी देखील जाती आहेत ज्यात अशी परंपरा आहे.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.