AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आव्हाडांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानामुळे सभागृहात गोंधळ, नंतर मागितली माफी

जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या उल्लेखावर आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर आव्हाड यांनी माफी मागितली. आव्हाड यांच्याविरोधात सत्ताधारी आक्रमक झाले.

आव्हाडांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानामुळे सभागृहात गोंधळ, नंतर मागितली माफी
jitendra awhad and dada bhuseImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 16, 2026 | 8:35 PM
Share

Jitendra Awhad : राज्य सरकारने आणलेल्या ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026’ वर आज विधानसभेत सखोल चर्चा झाली. या विधेयकात नेमक्या काय-काय तरतुदी आहेत, याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. विधेयकात सक्तीच्या धर्मांतराविरोधात काय शिक्षा असेल, याबाबतही त्यांनी सभागृहाला सांगितले. शिवसेनेच्या ठाकरे गटानेही या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र या विधेयकावर काही आक्षेप घेतले. या विधेयकाच्या माध्यमातून धर्मस्वातंत्र्य नव्हे तर धर्माला नियंत्रित केले जात आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला. याच वेळी भाषण करत असताना आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या उल्लेखावर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला. परिणामी सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला. गोंधळ वाढल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निर्देशानुसार आव्हाड यांनी सभागृहाची माफीदेखील मागितली.

आव्हाड नेमकं काय म्हणाले?

जितेंद्र आव्हाड हे धर्मस्वातंत्र्य विधेयकावर बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. या विधेयकाच्या माध्यमातून धर्मावर पाळत ठेवण्यात येत आहे. एखाद्याने धर्म बदलला तर त्याला थेट गुन्हेगार ठरवले जात आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला.

जेव्हा-जेव्हा धर्माविरोधात बोलण्याची वेळ आली, तेव्हा-तेव्हा लोक धर्माविरोधात उभे ठाकलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक का होऊ दिला नाही? तेव्हा कुठला धर्म आड आला होता? ते शूद्र होते म्हणून का? महात्मा फुले यांचा खून करण्याची सुपारी देण्यात आली. त्यांनी शिक्षणाचे दरावाजे खुले केले म्हणून ही सुपारी देण्यात आली होती का? सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर, अंगावर शेण फेकण्यात आलं, महिलांना शिक्षण दिलं म्हणून हे करण्यात आलं का? असे यावेळी आव्हाड सभागृहात म्हणाले. आपल्या भाषणात पुढे बोलताना, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा उल्लेख केला. त्यावरच सत्ताधाऱ्यांनी आक्षेप नोंदवला आणि निलंबनाची मागणी केली.

आव्हाड यांनी मागितली माफी

जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या उल्लेखांचा विरोध करण्यात आला. मंत्री शंभूराज देसाई यांनी आव्हाड यांच्यावर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाबाबत आव्हाड यांनी केलेले दावे आम्ही पहिल्यांदाच ऐकतो आहोत, असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे वक्तव्य करण्यात आले ते पटलावरून काढून टाकावे, अशी मागणी मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. तसेच पुढे सत्ताधारी आमदारांनी आव्हाड यांनी माफी मागावी त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली. ़विरोध वाढल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निर्देशानुसार आव्हाड यांनी माफी मागितली.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.