AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tushar Gandhi : महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींच्या वेदना बाहेर, म्हणाले नथुराम गोडसेची विचारधारा…

तुषार गांधी (Tushar Gandhi) यांच्या वेदना आज बाहेर आल्या आहेत, तषार गांधी म्हणतात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शिकवणीचे पालन करणार्‍यांची संख्या देशात कमी होत आहे, तर त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेची (Nathuram Godase) विचारधारा प्रबळ होत चालली आहे. असे ते म्हणाले आहेत.

Tushar Gandhi : महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींच्या वेदना बाहेर, म्हणाले नथुराम गोडसेची विचारधारा...
तुषार गांधींच्या वेदना बाहेर
| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 10:50 PM
Share

दादासाहेब कारंडे, प्रतिनिधी, मुंबईमहात्मा गांधींचे (Mahatma Gandhi) पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) यांच्या वेदना आज बाहेर आल्या आहेत, तषार गांधी म्हणतात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शिकवणीचे पालन करणार्‍यांची संख्या देशात कमी होत आहे, तर त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेची (Nathuram Godase) विचारधारा प्रबळ होत चालली आहे. महात्मा गांधी आणि त्यांचा मारेकरी नथुराम गोडसे यांच्याबाबत सुरू असलेल्या राजकारणादरम्यान राष्ट्रपिता यांचे पणतू तुषार गांधी यांचे वक्तव्य बाहेर आले आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करत असताना समाजात ‘द्वेषाचे विष’ पसरत असल्याचेही ते म्हणाले. 30 जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जेईएस कॉलेजच्या गांधी स्टडी सेंटरने आयोजित केलेल्या ‘कर के देखो’ या कार्यक्रमात तुषार गांधी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, पुरोगामी भारताची 75 गौरवशाली वर्षे आणि त्याच्या समृद्ध इतिहासाचे स्मरण करण्यासाठी सरकार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, परंतु आता ‘अमृत’ हे द्वेषाचे विष बनले आहे आणि ते वाढत आहे आणि पसरत आहे.

ते पुढे म्हणाले, ‘महात्मा गांधींची शिकवण संपुष्टात येत आहे आणि मारेकरी नथुराम गोडसेची विचारधारा हाती घेत आहे. लोकांचा एक वर्ग इतिहासाशी छेडछाड करत आहे आणि आपापल्या पद्धतीने त्याचे पुनर्लेखन करत आहे. पण आपल्याला खरा इतिहास पुनरुज्जीवित करायचा आहे आणि समाजातील द्वेष आणि विभाजनाविरुद्ध आवाज उठवायचा आहे.

तुषार गांधी म्हणाले की, आपण हिंसा, द्वेष आणि विभाजनाची संस्कृती स्वीकारली आहे. धर्म, जात, प्रदेश या आधारावर आपण विभागलो आहोत. आपली फूट ही आपली ओळख, मानसिकता आहे. ते म्हणाले की इतर सामाजिक व्यवस्था विभाजनावर आधारित आहेत. ते म्हणाले की, राष्ट्र म्हणजे केवळ सीमा, ध्वज आणि नकाशा नसतो. तुषार गांधी म्हणाले की, राष्ट्र ही एक भूमी आहे ज्यावर सर्व मानव राहतात. लोकच राष्ट्र घडवतात. असा पद्धतीने त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मोदी आणि शाहांनीही Why I Killed Gandhi सिनेमा पाहिला? निर्मात्या कल्याणी सिंग म्हणाल्या की…

Nana Patole : ‘महात्मा गांधीजींचा वध नथुराम गोडसेने केला’, नाना पटोलेंचं धक्कादायक विधान

Goa Elections 2022 : काँग्रेसनं 432 कोटी दिले होते, भाजपनं 2,567 कोटी दिले! गोव्यासाठी किती खर्च केला? शाहांनी वाचला पाढा

Follow Us
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा.
गॅस सिलेंडरसाठी मुंबईकर रांगेत; कांदिवलीत बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप
गॅस सिलेंडरसाठी मुंबईकर रांगेत; कांदिवलीत बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप.
सिलेंडर तुटवड्यावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
सिलेंडर तुटवड्यावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने.
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये..
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये...
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक.
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत.
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद.
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा.