AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरा शत्रू तर…, भारत-पाकिस्तानवर मलाला युसुफझाईची प्रतिक्रिया, वक्तव्य चर्चेत

पाकिस्तान आणि भारत हे एकमेकांचे शत्रू नाहीत, खरा शत्रू तर हा दहशतवाद आहे. मी दहशतवादाचा निषेध करते, भारत आणि पाकिस्तानने मिळून दहशतवादाचा सामना करायला पाहिजे, असं मलालाने म्हटलं आहे.

खरा शत्रू तर..., भारत-पाकिस्तानवर मलाला युसुफझाईची प्रतिक्रिया, वक्तव्य चर्चेत
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 08, 2025 | 9:34 PM
Share

जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध केला जात आहे, मंगळवारी मध्यरात्री भारतानं पाकिस्तानवर सर्जिक स्ट्राईक करून या हल्ल्याचा बदला घेतला आहे, पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आता आणखी वाढला आहे. भारताला युरोपीयन राष्ट्रं आणि अमेरिकेकडून समर्थ मिळत असल्याचं दिसून येत आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर आता शांतीचा नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईने प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि पाकिस्तान एकमेकांचे शत्रू नसल्याचं तिने म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाली मलाला

पाकिस्तान आणि भारत हे एकमेकांचे शत्रू नाहीत, खरा शत्रू तर हा दहशतवाद आहे. मी दहशतवादाचा निषेध करते, भारत आणि पाकिस्तानने मिळून दहशतवादाचा सामना करायला पाहिजे, आंतरराष्ट्रीय स्थरावर देखील या प्रश्नावर चर्चा होणं गरजेचं आहे, इतर देशांनी देखील या प्रकरणात लक्ष घालावं, सर्वांनी एकत्र येऊन दहशतवादाविरोधात लढा द्यायचा हवा, मला सुद्धा कधीकाळी याच दहशतवादाचा सामना कारवा लागला होता असं मलालाने म्हटलं आहे.

दरम्यान भारतानं आज सकाळीच पाकिस्तानच्या बारा शहरांवर पन्नास ड्रोन हल्ले केले होते, मात्र तरी देखील पाकिस्तानच्या कुरापती थांबण्याचं नाव घेत नाहीयेत, आता पुन्हा एकदा भारताच्या तीन राज्यांमध्ये पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे, जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमध्ये पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र हा हल्ल्याचा प्रयत्न फसला आहे. भारतानं पाकिस्तानचे सर्व मिसाईल पाडले आहेत. पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर आपटलं आहे.

भारताचा ड्रोन हल्ला 

दरम्यान त्यापूर्वी आज सकाळी भारतानं पाकिस्तानवर ड्रोन हल्ला केला होता, पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला, त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी हा हल्ला करण्यात आला, भारतानं पाकिस्तानच्या बारा शहरांवर पन्नास ड्रोन हल्ले केले, भारतानं पाकिस्तानची रडार सिस्टिम पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे.  त्यानंतर आता पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे.

Follow Us
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी खाद्य तेलाबाबत घोषणा केलीच...
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी घोषणा केलीच...  खाद्य तेलाबाबत एफडीएकडून कडक नियमावली
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरेंवर
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरे गटावर निशाणा!
पोलिस संरक्षण काढून ये मग... फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर,
Video : पोलिस संरक्षण काढून ये मग...  फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर, थेट बुलेटस्वारी करत स्वीकारलं चॅलेंज
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत, असं काही घडलं की...