भारतात कोरोनाचं थैमान, पंतप्रधान मोदी ‘मन की बात’मधून नागरिकांशी संवाद साधणार

देशभरात कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत (Man Ki Baat of PM Narendra Modi amid Corona).

भारतात कोरोनाचं थैमान, पंतप्रधान मोदी 'मन की बात'मधून नागरिकांशी संवाद साधणार
Follow us
| Updated on: Mar 29, 2020 | 9:50 AM

नवी दिल्ली : देशभरात कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत (Man Ki Baat of PM Narendra Modi amid Corona). कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी देशभरात सुरु घोषित केलेल्या लॉकडाऊन आणि शेतकऱ्यांच्या अडचणी यावर ते काही उपाययोजनांची घोषणा करणार का हेही या निमित्ताने स्पष्ट होणार आहे.

ऑल इंडिया रेडिओने पंतप्रधान मोदींच्या मन की बात या कार्यक्रमाची माहिती दिली आहे. ते आज सकाळी 11 वाजता या कार्यक्रमात बोलतील. मन की बात कार्यक्रम प्रत्येक महिन्याच शेवटच्या रविवारी होतो. याआधी पंतप्रधान मोदींनी कोरोना व्हायरसविरोधात लढण्याचं आवाहनही रेडिओवरुनच केलं होतं. यावेळी त्यांनी सकारात्मकतेला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचंही सांगितलं होतं.

पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना कोरोना विषाणू नियंत्रणासाठी सहकार्य करण्याचंही आवाहन केलं आहे. त्यांनी ट्विट करत देशवासीयांना पंतप्रधान सहायता निधीमध्ये योगदान देण्याचंही आवाहन केलं. या निधीचा उपयोग यापुढीही अशाप्रकारच्या मोठ्या संकटाच्या काळात केला जाईल, असं ते म्हणाले.

देशात कोरोना संसर्गाने हजाराचा टप्पा गाठला आहे. सरकारने कोरोना नियंत्रणासाठी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे शेती आणि शेतकऱ्यांवरही दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे देशातून शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची मागणीही होत आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.