AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री नाराज; भाजप नेत्यांवरच केले गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री नाराज झाला आहे. या नेत्याने भाजप नेत्यांवरच गंभीर आरोप केले आहेत. या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री नाराज; भाजप नेत्यांवरच केले गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
Modi government news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 29, 2026 | 1:44 PM
Share

केंद्रीय मंत्री,भाजपचे वरिष्ठ नेते जुएल ओराम यांनी पक्षातील नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. पक्षातील नेते मला केंद्रीय मंत्रि‍पदावरून हटवण्यासाठी षडयंत्र रचत आहेत. माझी राजकारणात विश्वासार्हता कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप जुएल ओराम यांनी केला आहे. जुएल यांच्या आरोपाने ओडिशातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

केंद्रीय मंत्र्यांचे जवळचे नेते राकेश पासवान यांच्या अटकेनंतर चर्चांना उधाण आलं आहे. ओडिशातील संघटीत गुन्हेगारी प्रकरणात पोलिसांनी राकेश पासवान यांना ताब्यात घेतलं. पासवान यांनी सरकारी अतिथी गृहात गुन्हेगारांना आश्रय दिल्याचाही आरोप आहे. परंतु पासवान यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणावर जुएल ओराम यांनी म्हटलं होतं की, कायद्याला त्याचं काम करू दिलं पाहिजे. कायदेशीर कारवाईवर कोणतीही आक्षेप नाही. यावेळी त्यांनी पक्षातील नेत्यांवरच हल्लाबोल केला.

ओराम हे सहा वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. ओराम म्हणाले, ‘पक्षातील काही लोक पाण्यासारखा पैसा माझ्या बदनामीसाठी खर्च करत आहे. केंद्रीय मंत्रि‍पदावरून हटवण्यासाठी काम सुरू आहे. त्यांना माझं केंद्रीय मंत्रिपद हवं आहे’. दरम्यान, जोराम यांनी यंदा लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. आता परिस्थिती पाहून 2029 साली लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार करेल’.

ओराम यांनी म्हटलं की, माझ्या विरोधात काम करणाऱ्यांमध्ये एका गट सामील आहे. यावरून ओराम यांनी भाजपचे संघटन महामंत्री यांना थेट तक्रार केली. ओराम यांनी रागाच्या सरकारला मोठा इशारा दिला. मला काही लोक बदनाम करू पाहत आहे. माझी त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची क्षमता आहे. माझ्यात हात कापण्याची देखील हिंमत आहे, अशा शब्दात संताप व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री जोराम यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावरून ओडिशामधील बीजू जनता दल आणि काँग्रेसने सत्ताधारी भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. बीजेडी नेते प्रमिला मलिक यांनी म्हटलं की, ‘ओरामहे राज्यातील आदिवासी समाजातील बडे नेते आहेत. त्यांच्या वक्तव्यावरून भाजपमधील अंतर्गत मतभेद किती खोल आहेत, हे दिसून येते. पक्षातील नेते जनतेचं काम करण्याऐवजी अंतर्गत वादात गुरफटले आहेत’. काँग्रेसनेही भाजपवर जोरदार निशाणा साधला.

Follow Us
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
NTA मध्ये मोठा फेरबदल, IPS रवी कुमार सिंह यांची NTA संचालकपदी नियुक्ती
NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
'हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'- गंगाधर काळकुटे
Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, 'हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'
राजीनामा द्या, आदिवासी आंदोलक अन् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी
नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा मंत्री अशोक उईकेंविरोधात एल्गार: राजीनाम्याची मागणी