AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चहा विक्रेता कानाराम मेवाड यांचा देशाला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी कौतुकास्पद प्रयत्न

प्लास्टिक एकीकडे गंभीर समस्या बनत असताना एक चहावाला मात्र या समस्येवर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

चहा विक्रेता कानाराम मेवाड यांचा देशाला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी कौतुकास्पद प्रयत्न
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jul 18, 2023 | 9:34 PM
Share

My India My Life Goals : प्लास्टिकचा शोध हा जगासाठी सुरुवातीला वरदान ठरेल असं वाटत होतं. पण आज प्लास्टिक हे जगासाठी समस्या बनले आहे. आज अनेक गोष्टी या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये दिल्या जातात. अनेक गोष्टी प्लास्टिकच्या बनवलेल्या जातात. प्लॅस्टिकच्या वस्तू रोजच्या कामात येऊ लागल्या. आज प्लास्टिक एक इतमी मोठी समस्या बनली आहे की आता त्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

प्लॅस्टिकमुळे आज जगभरात वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक संघटना यासाठी काम करत आहेत. तर काही लोकांनी वैयक्तिक या समस्येवर मात करण्यासाठी विडा उचलला आहे. प्लास्टिकवर अनेक देशात बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये भारत आघाडीवर आहे. भारत सरकारने 2022 मध्येच एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी घातली, तर दुसरीकडे देशात वैयक्तिक प्रयत्नही सुरू झाले.

राजस्थानचे कानाराम मेवाड यांनी देखील यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. राजस्थानमध्ये त्यांची ओळख कांजी चायवाला अशी आहे. चहाचा व्यवसाय करणारे कानाराम मात्र खूप मोठं काम करत आहेत. प्लास्टिक नष्ट करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे.

कानाराम मेवाड यांची राजस्थानच्या बिसलपूरमध्ये चहाची टपरी आहे. कानाराम म्हणतात की, प्लास्टिक हा या जगाचा शत्रू आहे, ज्याला लोकांनी घरात ठेवले आहे. प्लॅस्टिकविरोधातील मोहिमेबद्दल कानाराम सांगतात की, आम्ही आमच्या गावात आणि आजूबाजूला दुधाची पॅकेट, ब्रेडची पाकिटे यासारख्या घरगुती वस्तूंमध्ये वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकचे घरोघरी जाऊन संकलन सुरू केले. त्या बदल्यात आपण लोकांना काही ना काही देत ​​असतो. या योजना दर महिन्याला बदलत राहतात.

कानाराम सांगतात की दर महिन्याला 200 किलोपेक्षा जास्त प्लास्टिक त्यांच्याकडे येते. आम्ही त्याचा पुनर्वापर करत आहोत. ते म्हणतात की, या भागातील लोकांना आता पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी कळू लागली आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कानाराम इतर लोकांना ही आपली जबाबदारी समजून देशाला पुढे नेले पाहिजे. असे आवाहन करत आहेत.

Follow Us
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड