40 पैसे दिल्याने मरणार नाही, सरकार टॅक्सशिवाय चालणार नाही, UPI शुल्कावर थेट..
यूपीआयबद्दल सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत. त्यातच अनेकांनी शुल्क आकारणीला विरोध केला. 100 रूपयांवर फक्त 40 पैसे शुल्क आकारले जात आहे, त्यामुळे काही समस्या नसावी, असे मोठे विधान करण्यात आले.

केंद्र सरकारने यूपीआय व्यवहारावर आता शुल्क लागू केले आहे. आता अगोदरसारखे यूपीआय व्यवहार फ्रीमध्ये राहणार नाहीत. यावरून पूर्ण देशात वेगळा मुद्दा उठला आहे. या शुल्काला लोकांकडून विरोध केला जात आहे. काही लोक हे शुल्क चुकीचे असल्याचे सांगून विरोध करत आहेत. यासोबतच अजून एक मोठा धोका असा आहे की, ज्यामुळे पुन्हा एकदा रोख व्यवहार जास्त वाढेल. अधिकचे पैसे मोजण्याऐवजी रोख रक्कमेत लोक व्यवहार करतील. आमच्यावरील दबाव वाढत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. यादरम्यानच निती आयोगाचे वाईस चेअरमन यांचे मोठे विधान आले. निती आयोगाचे वाईस चेअरमन असलेल्या अशोक कुमार लाहिडी यांनी शुल्काचे पूर्ण समर्थन केले. त्यांनी स्पष्ट म्हटले की, टॅक्स वसूल केल्याशिवाय कोणतेही सरकार चालू शकत नाही. त्यांनी हे देखील स्पष्ट म्हटले की, सरकार एक शुल्क रक्कम वसूल करत आहे.
ही रक्कम देण्यासाठी कोणालाही काहीही समस्या नसावी. यादरम्यानच त्यांनी स्पष्ट केले की, हे त्यांचे वैयक्तीक मत आहे. निती आयोगाचे हे मत नाही. माझे स्पष्ट मत आहे की, लोकांनी प्रत्येक कामासाठी टॅक्स दिला पाहिजे. त्यांनी पुढे चाणक्य नीतीचे उदाहरण देत म्हटले की, राजाने आपल्या जनतेकडून टॅक्स अशाप्रकारे वसून केला पाहिजे,जश्या मध्यमाशा…
कोणतेही नुकसान न पोहोचता हळू हळू मध गोळा करायचा. त्यांनी पुन्हा पुन्हा म्हटले की, यूपीआयसंदर्भात जे शुल्क आकारण्यात आले, ते अत्यंत कमी आहे. 100 रूपयांच्या व्यवहारावर फक्त 40 पैसे शुल्क आकारले जात आहे. हळू हळू लोकांनाही याची सवय नक्कीच होईल. सरकार अगोदर 15 ऑक्टोंबरला 2000 च्या व्यवहारावर व्यापाऱ्यांना 0.4 टक्के शुल्क आकारेल.
त्यात लोकांना नाही तर व्यापाऱ्यांना ते शुल्क भरावे लागेल. यासोबतच त्यांनी स्पष्ट केले की, कोणतेही सरकार टॅक्सशिवाय चालू शकत नाही. 100 रूपयांवर 40 पैसे लागणार आहे, ते शुल्क भरायला काही समस्या नसावी, असेही त्यांनी म्हटले. यूपीआयबद्दल सरकारकडून कडक भूमिका घेतली जात आहे.
