AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

No-Confidence Motion Rejected | अखेर विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव लोकसभेत फेटाळला, सभागृहात काय-काय घडलं?

अखेर विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव लोकसभेत आज फेटाळण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून लोकसभेत अविश्वासाचा प्रस्ताव सादर झाल्यापासून जोरदार खडाजंगी रंगलेली बघायला मिळाली.

No-Confidence Motion Rejected | अखेर विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव लोकसभेत फेटाळला, सभागृहात काय-काय घडलं?
| Updated on: Aug 10, 2023 | 8:05 PM
Share

नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : अखेर विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव लोकसभेत आज फेटाळण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून लोकसभेत अविश्वासाचा प्रस्ताव सादर झाल्यापासून जोरदार खडाजंगी रंगलेली बघायला मिळाली. यावेळी सत्तेतील आणि विरोधातील अनेक नेते आमनेसामने आले. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भूमिका मांडली. नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत तब्बल अडीच तास भाषण केलं. त्यांनी आपल्या भाषणात मणिपूरच्या घटनेवर भाष्य केलं. तसेच विरोधकांच्या विविध आरोपांवर प्रतिक्रिया दिलीय. मोदी यांचं भाषण सुरु असताना विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला. पण मोदींनी आपलं भाषण सुरुच ठेवलं. अखेर मोदींच्या भाषणानंतर आवाजी मतदान पद्धतीने विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळण्यात आला.

नरेंद्र मोदी यांनी यावेळी सरकारी योजनांचा पाढा वाचला. तसेच आतापर्यंत काँग्रेसकडून झालेल्या घोटाळ्यांचा दावा त्यांनी विविध दावा केला. काँग्रेसच्या काळात अर्थव्यवस्था दहा ते बाराव्या जागेवर होती. पण आज देशाची अर्थव्यवस्थेवने टॉप फाईव्हमध्ये जागा बनवली. विरोधक 2028 मध्ये पुन्हा अविश्वासाचा प्रस्ताव आणतील तेव्हा देशाची अर्थव्यवस्था टॉप 3 मध्ये असेल, असा दावा नरेंद्र मोदी यांनी सभागृहात केला.

नरेंद्र मोदींकडून राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवरही टीका

नरेंद्र मोदी यांनी भाषणातून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. मणिपूरच्या आजच्या स्थितीला काँग्रेसचं राजकारण जबाबदार असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच अविश्वास प्रस्तावच्या माध्यमातून सरकारी योजना पोहोचवण्याची संधी आम्हाला मिळाली, असं नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी इंडिया आघाडीवरही टीका केली. इंडिया नाही तर घमंडिया आघाडी, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली. तसेच त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरही टीका केली.

नरेंद्र मोदी यांनी यावेळी मणिपूरच्या घटेनवरही भूमिका मांडली. त्यांनी मणिपूरच्या नागरिकांना परिस्थिती पुन्हा पूर्ववत होईल, असं आश्वासन दिलं. “मी मणिपूरच्या लोकांना, तिथल्या माता, बघिणी आणि मुलींना सांगू इच्छितो देश तुमच्यासोबत आहे. हे सदन तुमच्यासोबत आहे. आम्ही सर्व मिळून या आव्हानावर मार्ग काढू. तिथे पुन्हा शांततेची स्थापना होईल. मी मणिपूरच्या लोकांना विश्वास देतो की, मणिपूर पुन्हा विकासाच्या मार्गाने पुढे जाईल”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.
सुनेत्रा पवारांसह दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क
सुनेत्रा पवारांसह दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क.
शोकाकुल वातावरणात बारामतीत निवडणूक! रोहित पवारांनीही केलं मतदान
शोकाकुल वातावरणात बारामतीत निवडणूक! रोहित पवारांनीही केलं मतदान.
नाचरेवाडीत पावणे चार तासांपासून मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद
नाचरेवाडीत पावणे चार तासांपासून मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद.