AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओडिसा रेल्वे अपघात प्रकरणी CBI ची मोठी कारवाई, इंजिनिअरचे घर सील करताच परिवारासह बेपत्ता

Odisha Train Accident : ओडिशामधील भीषण रेल्वे अपघाताचा सीबीआयने तपास सुरु केला आहे. या प्रकरणी एका अभियत्याची चौकशी केली. या चौकशीनंतर तो परिवारासह बेपत्ता झाला आहे. यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

ओडिसा रेल्वे अपघात प्रकरणी CBI ची मोठी कारवाई, इंजिनिअरचे घर सील करताच परिवारासह बेपत्ता
Odisha train accident Image Credit source: tv9 marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 20, 2023 | 2:45 PM
Share

भुवनेश्वर : ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयचा तपास सुरु आहे. २ जून रोजी झालेल्या या अपघातात 278 जणांचा मृत्यू झाला होता तर 1100 लोक जखमी झाले होते. या तिहेरी रेल्वे अपघाताचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सुरू केला आहे. सीबीआयचे १० सदस्यीय पथकाने हा तपास सुरु केला आहे. या प्रकरणी सीबीआयने कनिष्ठ अभियंत्याची अज्ञातस्थळी चौकशी केली होती. त्यानंतर त्याचे घरही सील केले. परंतु त्यानंतर त्याचा परिवार बेपत्ता झाला आहे. यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

काय केली कारवाई

ओडिशात बालासोर येथे २ जून रोजी रेल्वेचा तिहेरी अपघात झाला होता. या अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. त्यानंतर सीबीआयने सोरो सेक्शनचे सिग्नल विभागातील कनिष्ठ अभियंता अमीर खान याची अज्ञात स्थळी चौकशी केली. त्यानंतर त्याचे घर सील केले. या घरात तो भाड्याने राहत होता. सीबीआयने चौकशी करताच तो कनिष्ठ अभियंतासह बेपत्ता झाला आहे.

प्राथमिक तपासात दावा

प्राथमिक तपासानंतर ओडिशामधील अपघातामागे सिग्नल प्रणालीत केलेला बदल हे अपघाताचे कारण असल्याचे मानले जात आहे. यामुळे रेल्वेने स्टेशन रिले रूम आणि कंपाऊंड हाउसिंग सिग्नलिंग उपकरणांच्या सुरक्षेसाठी सर्व विभागीय मुख्यालयांना अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तसेच एक सुरक्षा मोहीम देखील सुरू केली आहे, ज्यामध्ये दुहेरी लॉकिंग व्यवस्थेचा समावेश आहे.

कसा झाला अपघात

कोरोमंडल एक्सप्रेस ही चेन्नईहून पश्चिम बंगलाच्या हावडाकडे जात होती. ओडिशामधील बालासोरपासून 40 किमी अंतरावर ही एक्सप्रेस मालगाडीला धडकली आहे. या भीषण अपघातात कोरोमंडल एक्सप्रेसचे 18 डब्बे रुळावरुन घसरले आहेत. तर चार ते पाच डब्बे आडवे पडले आहेत. घटनास्थळी हाहाकार उडाला आहे

बहनागा स्टेशनजवळ शुक्रवारी कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची एकमेकांना धडक बसली. यानंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे डब्बे यशवंतपूर हावडा एक्स्प्रेस ज्या रेल्वे रुळावरुन जात होती, त्या ठिकाणी पडले. यामुळे या गाडीचा अपघात झाला. या तिहेरी अपघातात अनेक डब्बे मालगाडीवर चढले. सात डब्बे पलटी झाले. चार डब्बे रेल्वे बाँड्रीच्या बाहेर गेले. एकूण 15 डब्बे पटरीच्या बाहेर होते.

Follow Us
उगाचंच माझ्या XXX... हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा; संतप्त संजय दीना पाटलां
उगाचंच माझ्या XXX... हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा; संतप्त संजय दीना पाटलांचं थेट पोलीस आयुक्तांना आव्हान
राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय दिना पाटलांची जीभ घसरली; पत्रकारांशीच
Sanjay Dina Patil | राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय दिना पाटलांची जीभ घसरली; पत्रकारांशीच मग्रुरीची भाषा
राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं....
Sanjay Dina Patil | राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं पसरवलं जातंय म्हणत दिलं सडेतोड उत्तर
बीड हादरलं! CCTV फुटेजमध्ये काचेच्या बाटल्यांनी... विलास घुले प्रकरणात
बीड हादरलं! CCTV फुटेजमध्ये काचेच्या बाटल्यांनी... विलास घुले प्रकरणात धक्कादायक खुलासा, आता...
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी...
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी... राजकारणात मोठं घडतंय?
रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
Ratnagiri Rain News | रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
NCERT Portion | 1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर केस
Nasrapur case | मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर
आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू...
Shivsena | आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू; खासदार संजय जाधवांचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाले?