पाकिस्तान का खेळला पहलगाम हल्ल्याचा धोकादायक डाव? पाक लष्कर प्रमुखांची चूक किती महाग पडणार?
Pahalgam Terror Attack: भारत-पाकिस्तान युद्ध झाले तर पाकिस्तानचा निभाव लागणे अवघड आहे. भारतीय लष्कारापुढे पाकिस्तानचे मेड इन चायना शस्त्र टिकाव धरु शकणार नाही. दुसरीकडे भारताजवळ एकापेक्षा एक सर्वोत्तम शस्त्रास्त्र, फायटर जेट आहे. भारताजवळ 4.5 जेनरेशनचे फायटर जेट आहे. तसेच S-400 सारखी डिफेंन्स प्रणाली आहे.

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तानच्या मनात चांगलीच भीती निर्माण झाली आहे. भारताने केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानकडून ‘कॉपी पेस्ट’ कारवाई करण्यात आली. भारताने सिंधु नदी पाणी वाटप करार रद्द केला तर पाकिस्तानने शिमला करार स्थगित केला. दोन्ही देशांचा व्यापारही ठप्प होणार आहे. या हल्ल्याचे परिणाम पाकिस्तानसाठी किती महाग ठरतील, त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारीच स्पष्ट शब्दांमध्ये संकेत दिले. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्यापर्यंत पहलगाम हल्ल्याची संशयाची सूई जात आहे. काही दिवसांपूर्वी असीम मुनीर यांनी केलेले वक्तव्य पहलगाम हल्ल्याची तयारीच असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. पाकिस्तानला या हल्ल्याची किती मोठी किंमत चुकवावी लागेल, पाहू या एक्सप्लेनरमधून… ...