AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांकडून काही हजार रुपये घेऊन ‘त्या’ दोघांनी दिला आश्रय, NIA कडे कबुली

Pahalgam Terror Attack: राष्ट्रीय तपास संस्थाने रविवारी दोन काश्मीर लोकांना अटक केली होती. परवेझ अहमद जोठार आणि बशीर अहमद जोठार अशी त्यांची नावे आहेत. त्या दोघांवर गंभीर आरोप आहेत. त्यांनी तीन दहशतवाद्यांना मदत केली.

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांकडून काही हजार रुपये घेऊन 'त्या' दोघांनी दिला आश्रय, NIA कडे कबुली
pahalgam terror attackImage Credit source: tv9 marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 24, 2025 | 9:13 AM
Share

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या काश्मीरमधील दोघांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रविवारी अटक केली. या लोकांवर गंभीर आरोप आहे. परवेझ अहमद जोठार आणि बशीर अहमद जोठार या दोघांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना झोपडीत आश्रय दिला होता. त्यांना जेवणही दिले. हे तिन्ही दहशतवादी लश्कर-ए-तैयबाशी संबंधित होते. हे दहशतवादी हत्याकांड घडवणार असल्याचे परवेझ आणि बशीर यांना माहीत होते. परंतु काही हजार रुपयांसाठी त्यांनी दहशतवाद्यांची मदत केल्याचे एनआयएकडे मान्य केले.

हल्ल्याची माहिती होती…

राष्ट्रीय तपास संस्थाने रविवारी दोन काश्मीर लोकांना अटक केली होती. परवेझ अहमद जोठार आणि बशीर अहमद जोठार अशी त्यांची नावे आहेत. त्या दोघांवर गंभीर आरोप आहेत. तीन दहशतवाद्यांना त्यांनी आश्रय दिला. ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावर दहशतवादी एका झोपडीत थांबले होते. त्यानंतर त्यांनी रेकी केली. २२ एप्रिल रोजी २६ पर्यंटकांची हत्या केली. परवेझ आणि बशीर यांना दहशतवादी काश्मीरमध्ये हल्ला करणार असल्याचे माहीत होते. त्यानंतरही त्यांनी काही हजार रुपयांसाठी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचे तपासात कबुल केले.

परवेझ आणि बशीर यांना सोमवारी जम्मूमधील एनआयए कोर्टात आणण्यात आले. कोर्टाने त्यांना पाच दिवसांची एनआयए कोठडी दिली. या दोघांनी तिन्ही आरोपींची ओळख सांगितली आहे. परंतु एनआयएला अनेक पुरावे अजून जमा करायचे आहेत. दहशतवाद्यांची माहिती योग्य वेळी जाहीर करण्यात येणार असल्याचे एनआयएने म्हटले आहे.

सुरक्षेची दिली माहिती…

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परवेझ आणि बशीर फक्त आश्रय देणार नव्हते तर त्यांनी दहशतवाद्यांना इतर माहितीही दिली. एका अधिकाऱ्यांने सांगितले की, परिसरातील सुरक्षा व्यवस्थेची माहिती या दोघांनी दहशतवाद्यांना दिली. त्यामुळे दहशतवाद्यांना योजना बनवणे आणि हल्ला करणे त्यानंतर पळून जाण्यात मदत मिळाली. परवेझ आणि बशीर यांना माहीत होते की बैसरनमध्ये पर्यटकांवर हल्ला करण्याची योजना आहे. कारण त्यावेळी तिथे खूप पर्यटक आले होते. ते त्या भागात टट्टू चालवत असत. त्यामुळे त्यांना पोलिस आणि सुरक्षा चौक्यांबद्दल पूर्ण माहिती होती.

Follow Us
लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना...
लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना दिलेल्या खास संदेशाची सर्वत्र चर्चा
अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान;
अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान; अमित शाहांच्या हस्ते गौरव
सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी...
Raj Thackeray | सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी, राज ठाकरेंच्या दाव्याने खळबळ; भरसभेत...
ज्यांनी दिल्लीतून राजीनामा आणला त्यांना राज्यातून आणायला...' ठाकरेंचा
ज्यांनी दिल्लीतून राजीनामा आणला त्यांना राज्यातून आणायला...' ठाकरेंचा निशाणा नेमका कुणावर?
आमदार फोडण्यासाठी पैसे, तरुणांसाठी नाहीत; ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले
Raj Thackeray | आमदार फोडण्यासाठी पैसे आहेत, तरुणांसाठी नाहीत; राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान चर्चेत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत, म्हणाले 'तुम्ही म्हणाले ते मान्य मात्र...
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत...
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंची फटकेबाजी
अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर
Amit shah Pune Visit | अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर
LIVE मेळाव्यात घडलं अनपेक्षित! अमित ठाकरे भरसभेत बोलताना भाषणच विसरले
LIVE मेळाव्यात घडलं अनपेक्षित! अमित ठाकरे भरसभेत बोलताना भाषणच विसरले... Video होतोय व्हायरल
UPSC चा पेपर फुटत नाही, मग NEET चाच का? सुळेंचा सरकारला थेट सवाल
UPSC चा पेपर फुटत नाही, मग NEET चाच का? सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल