AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संसदेच्या सुरक्षा भंगाचे प्रकरण: पंतप्रधान मोदींनी आपल्या मंत्र्यांना काय दिल्या सूचना

संसदेच्या सुरक्षेतील मोठी चूक झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून उत्तराची मागणी केली आहे. दोन्ही सभागृहात यावरुन प्रचंड गोंधळ झाला. सभागृहाची सभ्यता मोडल्याने १४ खासदारांचं निलंबन करण्यात आलं. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना काय सूचना दिल्यात पाहा.

संसदेच्या सुरक्षा भंगाचे प्रकरण: पंतप्रधान मोदींनी आपल्या मंत्र्यांना काय दिल्या सूचना
modi
| Updated on: Dec 14, 2023 | 8:24 PM
Share

नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेत झालेल्या मोठ्या चुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार पंतरप्रधान मोदी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेण्याचे आणि त्यावर राजकारण करू नये असे निर्देश दिले आहे. आपण सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे असं ही ते म्हणाले आहेत.

विरोधी पक्षाने आज यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून उत्तर मागितले होते. दोन्ही सभागृहांमध्ये यावरुन गदारोळ झाला. त्यानंतर  14 खासदाराचे सभागृहात अवमान आणि अनादर केल्याबद्दल निलंबन करण्यात आले. टीएमसी खासदार डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे.

सरकारने काय म्हटले?

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, “कालची घटना दुर्दैवी होती. लोकसभा सदस्यांच्या सुरक्षेतील ही गंभीर त्रुटी होती. हे आपण सर्व मान्य करतो. लोकसभा अध्यक्षांच्या सूचनेवरून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे.

विरोधकांचा हल्लाबोल

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी राज्यसभेत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. सुरक्षेत चूक ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं त्यांनी म्हटले होते. अमित शहा यांनी सभागृहात उत्तर द्यावे. असे त्यांनी म्हटले होते. केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले होते की, काँग्रेससह इतर पक्ष राजकारण करत आहेत. राजकारण करण्यापेक्षा देशाला एकात्मतेचा संदेश द्यायला हवा. यानंतर विरोधी आघाडी ‘इंडिया’ने सभागृहातून वॉकआउट केला.

लोकसभेच्या कामकाजादरम्यान दोन जणांनी बुधवारी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली होती. यादरम्यान दोघांनी डब्यातून पिवळा धूर पसरवला. काही खासदारांनी त्यांना धरलं. दुसरीकडे अमोल शिंदे आणि नीलम देवी यांनी संसद परिसराबाहेर कॅनमधून रंगीत धूर सोडला आणि ‘हुकूमशाही चालणार नाही’ अशा घोषणा दिल्या.

पोलीस काय म्हणाले?

सागर, मनोरंजन, अमोल, नीलम आणि विकी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचा दुसरा साथीदार ललित याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, सहाही जण एकमेकांना आधीच ओळखत होते आणि त्यांनी काही दिवसांपूर्वी कट रचला होता.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....