AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र एटीएसने पीएफआयचे सगळे डाव उधळले…; अग्रवालांचा खळबळजनक दावा..

पीएफआय ही संघटना 2047 पर्यंत देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची योजना आखत होती. समाजात द्वेष पसरवणे हाच त्यांचा एकमेव हेतू होता.

महाराष्ट्र एटीएसने पीएफआयचे सगळे डाव उधळले...; अग्रवालांचा खळबळजनक दावा..
| Updated on: Sep 29, 2022 | 8:43 PM
Share

मुंबईः पीएफआय या संघटनेवर देशातील अनेक ठिकाणी कारवाई केल्यानंतर आता पुन्हा एकदा तपास यंत्रणांकडून कसून चौकशी सुरु करण्यात आली आहे. ही चौकशी सुरु असतानाच महाराष्ट्र एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल (Maharashtra ATS chief Vineet Agarwal)  यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. 2047 पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र (Islamic nation) बनवणे हे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनांचे (PFI) उद्दिष्ट होते. यासाठी देशभरात पीएफआयच्या शाखांचे जाळे विणले जात होते असंही सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणी लोकांना व्याख्यानं देऊन संघटनेचा विचार त्यांच्या मनात बिंबवला जात होता.

त्याचबरोबर आपापल्या घराच्या छतावर स्व-संरक्षणासाठी विटा, दगड आणि धारदार शस्त्रे ठेवण्याचा सल्लाही दिला जात असल्याचे एटीएस प्रमुखांनी सांगितले.

महाराष्ट्र एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांचा दावा केला आहे की, पीएफआय स्वतःला एक सामाजिक संस्था म्हणून सांगत असले तरी त्यामध्ये सत्यता नसल्याचेही सांगितले गेले आहे.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्र एटीएस प्रमुखांनी सांगितले की, ‘पीएफआय ही संघटना सामाजिक विकास, हक्क आणि न्याय आणि शारीरिक व्यायामा यासारख्या कामांसाठी मदत करणारी संस्था म्हणून सांगत असते.मात्र त्यामध्ये सत्यता नसल्याचे सांगण्यात आले आहे.

विनीत अग्रवाल यांनी पीएफआय या संघटनेविषयी माहिती देताना सांगितले की, आम्ही डेटा आणि पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत.

2047 पर्यंत देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची पीएफआयकडून योजना आखण्यात आली होती. समाजात द्वेष पसरवण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यातही या संघटनेचा हात होता असंही त्यांनी सांगितले.

त्यांच्या हेतूने टार्गेट ओळखून अडथळे निर्माण करून खुनाचा कट रचला जात होता. आम्ही लवकरच त्याचे खाते गोठवणार आहोत.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.