AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जनता कर्फ्यू’नंतर पंतप्रधान पहिल्यांदा बोलणार, कोरोना प्रसाराबाबत संबोधनाची वेळ ठरली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एक दिवस जनता कर्फ्यू पाळून सर्व देशवासियांना एक दिवस घरी थांबण्याचं आवाहन केलं होतं. (Narendra Modi to speak after Janta Curfew)

'जनता कर्फ्यू'नंतर पंतप्रधान पहिल्यांदा बोलणार, कोरोना प्रसाराबाबत संबोधनाची वेळ ठरली
| Updated on: Mar 24, 2020 | 11:32 AM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जनता कर्फ्यू’नंतर पहिल्यांदाच देशवासियांना संबोधित करणार आहेत. मोदी आज रात्री (24 मार्च) आठ वाजताचा मुहूर्त साधत ‘कोरोना व्हायरस’च्या वाढत्या प्रकोपासंदर्भात महत्त्वाची माहिती देणार आहेत. तमाम भारतीयांचे डोळे पंतप्रधानांच्या भाषणाकडे लागले आहेत. (Narendra Modi to speak after Janta Curfew)

भारतात 32 राज्यं किंवा केंद्रशासित प्रदेश लॉक डाऊन करण्यात आली आहेत. 560 जिल्ह्यांच्या सीमा सील आहेत. महाराष्ट्रात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एक दिवस जनता कर्फ्यू पाळून सर्व देशवासियांना एक दिवस घरी थांबण्याचं आवाहन केलं होतं. घरच्या घरी थाळीनाद किंवा घंटानाद करून अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. लॉक डाऊन गांभीर्याने न घेणाऱ्या नागरिकांविषयी मोदींनी ट्विटरवर नाराजी व्यक्त केली होती, मात्र जनता कर्फ्यूनंतर मोदींनी प्रत्यक्ष संवाद साधलेला नाही. (Narendra Modi to speak after Janta Curfew)

भारतात 492 जणांना कोरोनाची लागण झाली असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. 446 जण अद्यापही कोरोनाग्रस्त आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असून आकडा शंभरच्या पार गेला आहे.

‘कोरोना’विरोधी लढ्यात भारतासारख्या देशांनी जगाला मार्ग दाखवला पाहिजे, अशा शब्दात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारताच्या पाठीवर कौतुकाची थाप ठोकली आहे.

भारतासारख्या देशांनी जगाला मार्ग दाखवला पाहिजे. प्रसंगी आक्रमक व्हावं लागतं. सर्वसामान्यांपासून देशाच्या प्रमुखांपर्यंत सार्वजनिक आरोग्य राखणाऱ्या कृती गंभीर परिणामकारक ठरु शकतात, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने सांगण्यात आलं.

कांजिण्या आणि पोलिओ निर्मूलनात भारताने जगाचे नेतृत्व केले; सार्वजनिक आरोग्यासह समाज पातळीवरही भारताने आक्रमक कृती करणे चालूच ठेवले आहे हे खरोखर महत्वाचे आहे, अशा शब्दात भारताचा गौरव करण्यात आला.

(Narendra Modi to speak after Janta Curfew)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.