AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृषी कायद्याविरोधात हरियाणात राडा, मुख्यमंत्री येण्याआधीच स्टेजची तोडफोड, पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

मनोहर लाल खट्टर कार्यक्रम स्थळी दाखल होण्याआधीच शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवत भाजप सरकारचा विरोध केला (Police Lathi charge on haryana karnal farmers)

कृषी कायद्याविरोधात हरियाणात राडा, मुख्यमंत्री येण्याआधीच स्टेजची तोडफोड, पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 10, 2021 | 4:33 PM
Share

चंदीगड : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला आता हिंसक वळण येताना दिसत आहे. कारण हरियाणात भाजपच्या किसान संवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांनी प्रचंड गोंधळ घातला. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर कार्यक्रम स्थळी येण्याआधी स्टेजची तसेच खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. हा राडा इतका वाढला की, अखेर पोलिसांना शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करावा लागला (Police Lathi charge on haryana karnal farmers).

हरियाणाच्या करनाल येथील कैमला गावात आज (10 जानेवारी) भाजपकडून किसान संवाद कार्यकर्माचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे शेतकऱ्यांना संबोधित करणार होते. केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायद्यांचा किती फायदा आहे, याबाबत ते शेतकऱ्यांना माहिती देणार होते. मात्र, खट्टर कार्यक्रम स्थळी दाखल होण्याआधीच शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवत भाजप सरकारचा विरोध केला. त्यांनी खट्टर यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

या दरम्यान पोलिसांनी शेतकऱ्यांची मनधरणी करण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र, शेतकरी ऐकायला तयार नव्हते. त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. त्याचबरोबर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. गर्दी पांगावी यासाठी पोलिसांनी शेतकऱ्यांवर जलफवारे देखील केले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अखेर खट्टर यांचा दौरा रद्द करण्यात आला.

काँग्रेसचा खट्टर सरकारवर निशाणा

या घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी खट्टर यांच्यावर टीका केली. “खट्टर सरकारने शेतकऱ्यांच्या महापंचायतीचं ढोंग करणं बंद करावं. अन्नदाताच्या भावनांशी खेळून कायदा बिघडण्याचा प्रयत्न बंद करा. संवाद करायचाच असेल तर गेल्या 46 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या अन्नदात्यांशी करा”, असं सुरजेवाला यांनी सुनावलं (Police Lathi charge on haryana karnal farmers).

हेही वाचा : Special story | ‘बचेंगे तो और भी लढेंगे’, पानिपतची लढाई ते शेतकरी आंदोलन, बुराडीचा रक्तरंजित आणि धगधगता इतिहास

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.