AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीतील ट्रॅक्टर रॅली दरम्यान उसळलेल्या हिंसेनंतर 100 पेक्षा अधिक शेतकरी बेपत्ता

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकरी आंदोलनाचं हिंसेत रुपांतर झाल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. या हिंसेनंतर पंजाबचे जवळपास 100 पेक्षा जास्त शेतकरी बेपत्ता आहेत. (100 protester farmers missing in 26 January violence)

दिल्लीतील ट्रॅक्टर रॅली दरम्यान उसळलेल्या हिंसेनंतर 100 पेक्षा अधिक शेतकरी बेपत्ता
| Updated on: Feb 01, 2021 | 10:43 PM
Share

चंदिगड : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकरी आंदोलनाचं हिंसेत रुपांतर झाल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. या हिंसेनंतर पंजाबचे जवळपास 100 पेक्षा जास्त शेतकरी बेपत्ता आहेत. या शेतकऱ्यांचा तपास लागावा यासाठी पंजाबचे मंत्री सुखजिंदर रंधावा आणि खासदार मनिष तिवारी यांच्या नेतृत्वातील मंत्र्यांनी सोमवारी (1 फेब्रुवारी) गृहमंत्री अमित शाह यांची संसदेत भेट घेतली. याबाबत मनिष तिवारी यांनी ट्विटरवर माहिती दिली (100 protester farmers missing in 26 January violence).

“शेतकरी आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसेत अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची यादी सार्वजनिक करावी, अशी विनंती आम्ही गृहमंत्र्यांना केली आहे. जेणेकरुन त्यांना कायदेशीर मदत दिली जाईल. दिल्ली पोलिसांनी आपल्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती द्यावी”, असं मनिष तिवारी यांनी सांगितलं (100 protester farmers missing in 26 January violence).

अटकेत असलेल्या शेतकऱ्यांच्या सूटकेसाठी वकिलांची फौज

“दिल्लीत झालेल्या हिंसेदरम्यान अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना सोडवण्यासाठी पंजाब सरकारने 40 वकिलांची फौज तयार केली आहे. हे वकील अटकेत असलेल्या शेतकऱ्यांची बाजू मांडतील. शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटतील. वकिलांची ही टीम शेतकऱ्यांसाठी मोफत लढेल”, असं रंधावा यांनी सांगितलं.

दिल्ली पोलिसांकडून 80 पेक्षा जास्त जणांना अटक

प्रजासत्ताक दिनी उसळलेल्या हिंसेप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 35 पेक्षा जास्त केस दाखल केले आहेत. याप्रकरणी 80 पेक्षा जास्त लोकांना अटक केली आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

अमित शाह यांनी अटक केलेल्या आंदोलकांची नावे वेबसाईटवर टाकल्याची माहिती दिली आहे. याशिवाय केंद्र सरकारने आणखी काही बेपत्ता लोकांची नावे जाहीर केली असतील तर केंद्र सरकार अशा शेतकऱ्यांचादेखील शोध घेईल, असं अमित शाह यांनी सांगितल्याची माहिती रंधावा यांनी दिली.

हेही वाचा : त्यांच्या जाण्याने आम्हाला काही फरक पडत नाही, राजू पाटील यांची प्रतिक्रिया

Follow Us
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.