AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीतील ट्रॅक्टर रॅली दरम्यान उसळलेल्या हिंसेनंतर 100 पेक्षा अधिक शेतकरी बेपत्ता

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकरी आंदोलनाचं हिंसेत रुपांतर झाल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. या हिंसेनंतर पंजाबचे जवळपास 100 पेक्षा जास्त शेतकरी बेपत्ता आहेत. (100 protester farmers missing in 26 January violence)

दिल्लीतील ट्रॅक्टर रॅली दरम्यान उसळलेल्या हिंसेनंतर 100 पेक्षा अधिक शेतकरी बेपत्ता
| Updated on: Feb 01, 2021 | 10:43 PM
Share

चंदिगड : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकरी आंदोलनाचं हिंसेत रुपांतर झाल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. या हिंसेनंतर पंजाबचे जवळपास 100 पेक्षा जास्त शेतकरी बेपत्ता आहेत. या शेतकऱ्यांचा तपास लागावा यासाठी पंजाबचे मंत्री सुखजिंदर रंधावा आणि खासदार मनिष तिवारी यांच्या नेतृत्वातील मंत्र्यांनी सोमवारी (1 फेब्रुवारी) गृहमंत्री अमित शाह यांची संसदेत भेट घेतली. याबाबत मनिष तिवारी यांनी ट्विटरवर माहिती दिली (100 protester farmers missing in 26 January violence).

“शेतकरी आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसेत अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची यादी सार्वजनिक करावी, अशी विनंती आम्ही गृहमंत्र्यांना केली आहे. जेणेकरुन त्यांना कायदेशीर मदत दिली जाईल. दिल्ली पोलिसांनी आपल्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती द्यावी”, असं मनिष तिवारी यांनी सांगितलं (100 protester farmers missing in 26 January violence).

अटकेत असलेल्या शेतकऱ्यांच्या सूटकेसाठी वकिलांची फौज

“दिल्लीत झालेल्या हिंसेदरम्यान अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना सोडवण्यासाठी पंजाब सरकारने 40 वकिलांची फौज तयार केली आहे. हे वकील अटकेत असलेल्या शेतकऱ्यांची बाजू मांडतील. शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटतील. वकिलांची ही टीम शेतकऱ्यांसाठी मोफत लढेल”, असं रंधावा यांनी सांगितलं.

दिल्ली पोलिसांकडून 80 पेक्षा जास्त जणांना अटक

प्रजासत्ताक दिनी उसळलेल्या हिंसेप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 35 पेक्षा जास्त केस दाखल केले आहेत. याप्रकरणी 80 पेक्षा जास्त लोकांना अटक केली आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

अमित शाह यांनी अटक केलेल्या आंदोलकांची नावे वेबसाईटवर टाकल्याची माहिती दिली आहे. याशिवाय केंद्र सरकारने आणखी काही बेपत्ता लोकांची नावे जाहीर केली असतील तर केंद्र सरकार अशा शेतकऱ्यांचादेखील शोध घेईल, असं अमित शाह यांनी सांगितल्याची माहिती रंधावा यांनी दिली.

हेही वाचा : त्यांच्या जाण्याने आम्हाला काही फरक पडत नाही, राजू पाटील यांची प्रतिक्रिया

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.