AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अग्निवीर शहीद झाला तरी लष्कराने सलामी दिली नाही, प्रायव्हेट एम्ब्युलन्सने पाठविला मृतदेह, केंद्र सरकारविरोधात संताप

भारतीय सैन्यात तरुणा देश सेवा करण्याची संधी मिळण्यासाठी केंद्र सरकारने अग्निवीर भरती मोहिम सुरु केली असली तरी या तरुणांना अन्य सैन्याप्रमाणे दर्जा मिळत नसल्याचे उघड झाले आहे.

अग्निवीर शहीद झाला तरी लष्कराने सलामी दिली नाही, प्रायव्हेट एम्ब्युलन्सने पाठविला मृतदेह, केंद्र सरकारविरोधात संताप
agniveer amritpal singhImage Credit source: socialmedia
| Updated on: Oct 15, 2023 | 4:52 PM
Share

पंजाब | 15 ऑक्टोबर 2023 : सैन्यात तरुणांसाठी ‘अग्निवीर भरती’ सुरु झाली असली त्यामागील भयानक सत्य उघड झाले आहे. या योजनेत भरती झालेला पंजाबचा जवान अमृतपाल सिंह हा 19 वर्षी शहीद झाल्यानंतर त्याचा मृतदेहाला खाजगी एम्ब्युलन्सने पाठविले. तसेच त्याच्या पार्थिवाला त्याच्या बहिणींना खांदा द्यावा लागल्याने केंद्र सरकारवर विरोधी पक्ष आणि पंजाब सरकारने टीका केली आहे. अग्निवीर योजनेत भरती झालेले जवान शहीद नाहीत का असा सवाल त्यांनी केला आहे. दरम्यान, या जवानाला ‘गार्ड ऑफ ऑनर’ न देण्यामागे सरकारने कारण सांगितले आहे.

अग्निवीर योजनेत तरुणांना देशाच्या सेवेसाठी भरती केले जात आहे. परंतू या योजनेतून भरती झालेला आणि पहिला शहीद ठरलेल्या पंजाबच्या अमृतपाल सिंह ( वय 19 ) याचा मृतदेह खाजगी एम्ब्युलन्सने पंजाबच्या त्यांच्या घरी पाठविण्यात आले. त्यांना कोणतेही गार्ड ऑफ ऑनर दिले नाही. त्यामुळे शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम मजीठीया यांनी शहीदाला सन्मान न दिल्याबद्दल केंद्र सरकारवर टीका केली आहे. आता ही योजनाच रद्द करुन आतापर्यंत भरती केलेल्या अग्निवीरांना कायम स्वरुपी सैन्यात भरती करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने या घटनेला दुर्दैवी म्हटले आहे. परंतू अमृतपाल याचा मृत्यू राजौरी सेक्टरमध्ये ड्यूटी करताना चुकून स्वत:च्या बंदुकीची गोळी लागल्याने झाल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाची कोर्ट ऑफ इन्वायरी सुरु असून त्यातून खरी बाब उलगडेल असे म्हटले आहे.

राज्य सरकारने घेतला निर्णय

अग्निवीर अमृतपाल सिंह याचा 11 ऑक्टोबर रोजी जम्मू – कश्मीर येथे ऑन ड्यूटी गोळी लागून मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह खाजगी एम्ब्युलन्समधून घरी पाठविण्यात आला होता. तसेच सैन्यातर्फे कोणतीही मानवंदना देण्यात आली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी आता केंद्र सरकार टीका केली आहे. शहीदांप्रती सैन्याने कोणताही निर्णय घेतला असला तरी राज्य सरकारने त्यास शहीदाचा दर्जा देत सैनिकाच्या कुटुंबियांनी एक कोटी रुपायांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक्स पोस्ट टाकीत म्हटले आहे.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.