AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकारचं एकच काम, ‘गायब करणं’ : राहुल गांधी

नवी दिल्ली : युवकांचे रोजगार गायब झाले, 15 लाखांचं आश्वासन गायब झालं आणि काल राफेलच्या फाईल गायब झाल्या, असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच, मोदी सरकारचं एकच काम, ते म्हणजे ‘गायब करणं’, असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला. राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राफेलच्या फाईल्स […]

मोदी सरकारचं एकच काम, 'गायब करणं' : राहुल गांधी
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM
Share

नवी दिल्ली : युवकांचे रोजगार गायब झाले, 15 लाखांचं आश्वासन गायब झालं आणि काल राफेलच्या फाईल गायब झाल्या, असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच, मोदी सरकारचं एकच काम, ते म्हणजे ‘गायब करणं’, असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला. राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राफेलच्या फाईल्स चोरीला गेल्याच्या प्रकरणावरुन मोदी सरकारवर निशाणा साधलाय.

मोदी सरकारचं एकच काम, ‘गायब करणं’ : राहुल गांधी

“युवकांचे रोजगार गायब झाले, 15 लाखांचं आश्वासन गायब झालं आणि काल राफेलच्या फाईल गायब झाल्या. मोदी सरकारचं एकच काम, ते म्हणजे गायब करणं” असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला.

मोदींच्या चौकशीची मागणी

राफेलच्या चोरी झालेल्या कागदपत्रात ज्यांची नावं आहेत, त्यांच्यावर कारवाई करा. त्यात सरळसरळ पंतप्रधानांच नाव आहे, असे राहुल गांधी म्हणाले. “ज्यांच्यावर कारवाई करायची, त्यांच्यावर करा, पण पंतप्रधानांवरही कारवाई करा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

राफेल कराराची फाईल गायब झाली. या करारात सरकार चौकीदाराला (मोदी) वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

“राफेलच्या फाईलमध्ये पंतप्रधान कार्यलयाचं नाव आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चौकशी व्हायला हवी. जे पंतप्रधानांवर आरोप करतात, त्यांची चौकशी होऊ शकते, मात्र पंतप्रधानांचं नाव कागदपत्रात असलं, तरी त्यांची चौकशी का होऊ शकत नाही?”, असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला. सगळ्यांना समान न्याय लावला पाहिजे, असेही राहुल गांधी म्हणाले.

Follow Us
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.