AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi on Manipur | मणिपूर जळावं अशी पंतप्रधानांची इच्छा – राहुल गांधी

Rahul Gandhi on Manipur | मणिपूरमध्ये सुरु असलेला मूर्खपणा भारतीय सैन्य दोन दिवसात थांबवेल. पण मणिपूर जळावं अशी पंतप्रधानांची इच्छा आहे. त्यांना आग विझवायची नाहीय, असा आरोप राहुल गांधी यांनी केलीय.

Rahul Gandhi on Manipur | मणिपूर जळावं अशी पंतप्रधानांची इच्छा - राहुल गांधी
rahul gandhi
| Updated on: Aug 11, 2023 | 3:49 PM
Share

नवी दिल्ली : “पंतप्रधान नरेंद्र मोदी काल संसेदत 2 तास 13 मिनिट बोलले. शेवटी फक्त 2 मिनिट ते मणिपूरवर बोलले. मणिपूर अनेक महिन्यांपासून जळत आहे. निरपराध लोकांची हत्या केली जात आहे. बलात्कार होत आहेत. पण पंतप्रधान हसत आहेत, त्यांचे जोक सुरु आहेत. हे त्यांना शोभत नाही” अशा शब्दात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सरकार विरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. त्यावेळी त्यांनी काँग्रेस प्रणीत इंडियाचा समाचार घेतला.

“मणिपूरमध्ये सुरु असलेला मूर्खपणा भारतीय सैन्य दोन दिवसात थांबवेल. पण मणिपूर जळावं अशी पंतप्रधानांची इच्छा आहे. त्यांना आग विझवायची नाहीय” असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

‘म्हणून मी म्हणालो, मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या करण्यात आलीय’

“मी मणिपूरमध्ये मैती भागात गेलो. त्यावेळी मला स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की, माझ्या सुरक्षेमध्ये कोणी कुकी असेल, तर त्याला इथे आणू नका. आम्ही त्याची हत्या करु. आम्ही कुकींच्या भागात गेलो, त्यावेळी त्यांनी सुद्धा हेच सांगितलं. कुठला मैती इथे आणला, तर आम्ही त्याला गोळी घालू. त्यामुळे मणिपूर एक राज्य नाहीय. त्याची दोन भागात विभागणी झालीय. राज्याची हत्या करण्यात आलीय. म्हणून मी म्हणालो, मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या करण्यात आलीय” असं काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले.

त्यांचा तो हेतूच दिसत नाही

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमीत कमी मणिपूरमध्ये जावं. त्या समुदायाशी बोलावं. मी तुमचा पंतप्रधान आहे, हे त्यांना सांगावं. पण मला त्यांचा तो हेतूच दिसत नाही. पंतप्रधान मोदी 2024 मध्ये पंतप्रधानपदी कायम राहतील का? हा प्रश्न नाहीय. प्रश्न मणिपूरचा आहे. लहान मुलं, नागरिकांची हत्या सुरु आहे” असं राहुल गांधी म्हणाले.

तर ते राजकारणी वाटतील

“पंतप्रधान पंतप्रधानांसारखे वागले, तर ते राजकारणी वाटतील. ते देशाच आवाज वाटले पाहिजेत. राजकारण बाजूला ठेवावं. पंतप्रधानांनी राजकारण्यासारख बोलू नये. त्यांच्यामागे भारतीय जनता अशा पद्धतीने बोलावं” असं राहुल गांधी म्हणाले. ‘मीडिया नियंत्रणाखाली आहे’

“मीडिया नियंत्रणाखाली आहे, हे मला माहित आहे. राज्यसभा, लोकसभा टीव्ही नियंत्रणाखाली आहे. पण मी माझं काम करतोय आणि करत राहीन. जेव्हा कधी भारत मातेवर हल्ला होईल, तेव्हा तुम्ही मला तिथे भारत मातेच रक्षण करताना पाहाल” असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

Follow Us
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक.
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख...
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख....
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....