AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi speech | मणिपूरवर बोलतांना पीएम मोदी यांनी केला त्या तीन घटनांचा उल्लेख

Narendra modi lok sabha LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत अविश्वास प्रस्ताववर विरोधकांना जोरदार उत्तर दिले. यावेळी त्यांनी तीन घटनांचा उल्लेख करत काँग्रेसलाच घेरले.

PM Modi speech | मणिपूरवर बोलतांना पीएम मोदी यांनी केला त्या तीन घटनांचा उल्लेख
| Updated on: Aug 10, 2023 | 8:07 PM
Share

नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी लोकसभेत आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, अविश्वास प्रस्तावाची ताकद आहे की आपण पंतप्रधान मोदींना सभागृहात खेचून आणले. मंगळवारपासून अविश्वास ठरावावर सभागृहात जोरदार चर्चा आणि खडाजंगी सुरू आहे. बुधवारी काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी यांनी चर्चेत भाग घेतला. मणिपूर हिंसाचारावर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधी यांनी मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या झाल्याचे म्हटले होते. त्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि नंतर अमित शहा यांनी राहुल गांधी यांना जोरदार प्रत्यूत्तर दिले.

आज पंतप्रधान मोदी यांनी अविश्वास ठरावावर उत्तर देत असताना तीन घटनांचा उल्लेख केला. मोदी हे ईशान्येला देशाचा भाग मानत नाहीत, असे विरोधी पक्षाने म्हटले होते. यावर उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी तीन घटनांचा उल्लेख केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 5 मार्च 1966 रोजी मिझोराममधील असहाय नागरिकांवर हल्ला करण्यासाठी काँग्रेसला हवाई दल मिळाले. मिझोरामचे लोक भारताचे नागरिक नव्हते का म्हणून काँग्रेसने निष्पाप नागरिकांवर हल्ले केले होते. आजही 5 मार्चला संपूर्ण मिझोरममध्ये शोक दिवस पाळला जातो. काँग्रेसने हे सत्य लपवले, जखम भरण्याचा प्रयत्न कधी केला नाही. त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या.

दुसरी घटना 1962 ची आहे. ते भितीदायक प्रसारण लक्षात ठेवा. चीनकडून देशावर हल्ले होत होते. लोकांना मदतीची अपेक्षा होती. अशा कठीण काळात पंडित नेहरू म्हणाले होते की, माझे हृदय आसामच्या लोकांसाठी जाते. नेहरूंनी तिथल्या लोकांना त्यांच्या नशिबावर जगायला सोडलं होतं.

मोदी पुढे म्हणाले की, जे स्वत:ला लोहियांचे वारसदार ठरवतात. लोहिया यांनी नेहरूंवर आरोप करत म्हणाले की, नेहरू जाणूनबुजून ईशान्येचा विकास करत नाहीत. ती जागा सर्व प्रकारच्या विकासापासून वंचित राहिली आहे.

मोदी पुढे म्हणाले की, ज्या ठिकाणी लोकसभेच्या एक-दोन जागा होत्या त्याकडे काँग्रेसने लक्ष दिले नाही. पण आमच्यासाठी ईशान्य म्हणजे यकृताचा तुकडा आहे. ईशान्य, मणिपूरमधील सद्यस्थितीला काँग्रेसच कारणीभूत असल्याचे मोदी म्हणाले.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.