AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : राहुल गांधींचा के. चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार हल्लाबोल; तेलंगणातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचं मोठं आश्वासन

राजा जनतेचा आवाज ऐकत नाही, त्याला जे करायचं असतं ते तो करतो. तुमचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांचा आवाज ऐकत नाहीत. तेलंगणाचे शेतकरी मिर्ची आणि धानाला चांगली किंमत मागत आहेत आणि त्यांचं कर्ज माफ करायला हवं, असं राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi : राहुल गांधींचा के. चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार हल्लाबोल; तेलंगणातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचं मोठं आश्वासन
राहुल गांधी, खासदार, काँग्रेसImage Credit source: TV9
| Updated on: May 06, 2022 | 11:36 PM
Share

नवी दिल्ली : तेलंगणात काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आज तेलंगणात (Telangana) मुख्यमंत्री आहेत मात्र हे मुख्यमंत्री नाही तर राजा आहेत. राजा आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काय फरक असतो? मुख्यमंत्री जनतेचा आवाज ऐकतो. तर राजा जनतेचा आवाज ऐकत नाही, त्याला जे करायचं असतं ते तो करतो. तुमचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांचा आवाज ऐकत नाहीत. तेलंगणाचे शेतकरी मिर्ची आणि धानाला चांगली किंमत मागत आहेत आणि त्यांचं कर्ज माफ (Farmer loan waiver) करायला हवं, असं राहुल गांधी म्हणाले.

‘शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतच कर्ज माफ करणार’

तेलंगणात काँग्रेसची सत्ता आल्यास शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतच कर्ज माफ करणार आणि योग्य आधारभूत किंमत देणार, अशी घोषणाच राज ठाकरे यांनी केलीय. इकडे शेतकऱ्या विधवा रडत आहेत, ही जबाबदारी कुणाची? एक नाही तेलंगणात अशा हजारो भगिनी आहेत, ज्यांच्या पतीने आत्महत्या केलीय. ही जबाबदारी कुणाची? असा सवाल राहुल गांधी यांनी केलाय. इतकंच नाही तर निवडणुकीत काँग्रेसचं तिकीट योग्यतेच्या आधारावर दिलं जाईल. तुम्ही कितीही शक्तीशाली असाल, कितीही मोठे असाल, जर तुम्ही गरीबांच्या, शेतकऱ्यांच्या सोबत नाहीत, तर तुम्हाला काँग्रेसचं तिकीट मिळणार नाही, असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

केसीआर यांच्यावर जोरदार टीका

राहुल गांधी यांनी तेलंगनाच्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलीय. भाजपला माहिती आहे की काँग्रेस त्यांच्यासोबत कधीही तडजोड करणार नाही. त्यामुळेच ते तेलंगणात टीआरएस सरकार आणण्याच्या प्रयत्न करतेय. त्याचा परिणाम असा होईल की, तेलंगणाचे मुख्यमंत्री पाहिजे तेव्हा पैसा चोरू शकतील आणि केंद्र सरकार त्यांच्या मागे ईडीची पिडा लावणार नाहीत. राहुल गांधी हे सध्या तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी कविता यांनी त्यांच्या उस्मानिया विद्यापीठाच्या दौऱ्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. राहुल गांधी यांनी कधीही तेलंगणाच्या बाजुने भूमिका घेतली नाही. मग ते वारंगल आणि उस्मानिया विद्यापीठात का जात आहेत? असा सवाल त्यांनी केला होता.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.