AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेत झाला होता हा त्रास, केरळात सुरु होते आठवडाभर उपचार

राहुल गांधी यांनी चार हजार किमीची भारत जोडो यात्रा केली. त्यामुळे त्यांना रोज सहा ते सात किमी अंतर चालावे लागायचे. त्याचा त्रासही झाला.

राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेत झाला होता हा त्रास, केरळात सुरु होते आठवडाभर उपचार
rahul gandhi Image Credit source: socialmedia
| Updated on: Jul 30, 2023 | 8:53 PM
Share

केरळ | 30 जुलै 2023 : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची चार हजार किमीची भारत जोडो यात्रा केली. परंतू ही यात्रा करताना त्यांना दुखणं जडलं होतं. त्यामुळे राहुल गांधी यांनी केरळच्या प्रसिद्ध कोट्टक्कल आर्य वैद्यशाळेमध्ये आठवडाभर उपचारा केल्यानंतर त्यांना आता बरे वाटू लागल्याने त्यांची या आर्युर्वेदिक रुग्णालयातून सुटका झाली आहे. त्यांनी रुग्णालयात काळजी घेणाऱ्या डॉक्टर आणि स्टाफचे आभार मानले आहे.

राहुल गांधी यांनी चार हजार किमीची भारत जोडो यात्रा केली. त्यामुळे त्यांना रोज सहा ते सात किमी अंतर चालावे लागायचे. त्याचा त्रासही झाला. त्यांना गुडघे दुखीला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांनी केरळ येथील प्रसिद्ध आयुर्वेदिक संस्थानात आपल्या गुडघ्यावर उपचार केले. राहुल गांधी यांनी फेसबुक पोस्टवर लिहीले की रुग्णालयात काही दिवस राहील्यानंतर मला आता ताजेतवाने वाटत आहे. त्यांनी रुग्णालयातील वास्तव्या दरम्यान त्यांची काळजी घेणाऱ्या प्रेमाने सुश्रृषा करणाऱ्या वैद्यक आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

कर्मचाऱ्यांचे हार्दिक धन्यवाद

फेसबुकच्या पोस्टमध्ये राहुल गांधी लिहीतात की, कोट्टक्कल मधील आर्य वैद्यशाळेतील माझा अनुभव मला ताजातवाना करणारा आहे. माझी काळजी घेणाऱ्या आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या डॉ. पी. एम. वेरियर आणि त्यांच्या टीम तसेच रुग्णालयाच्या अन्य कर्मचाऱ्यांचे हार्दिक धन्यवाद देत आहे.

भारत जोडो यात्रा काय होती

कन्याकुमारीपासून सुरु झालेली राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा श्रीनगरमध्ये समाप्त झाली होती. 12 राज्ये आणि 2 केंद्र शासित प्रदेशतातून ही यात्रा गेली.राहुल गांधी यांनी या यात्रेत 3 हजार 570 किलोमीटरचा प्रवास रात्रीचा मुक्काम करीत पायी केला होता. गेल्यावर्षी 7 डिसेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरु झालेली ही भारत जोडो यात्रा 30 जानेवारी रोजी 146 दिवसांनी संपली.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा