AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेत झाला होता हा त्रास, केरळात सुरु होते आठवडाभर उपचार

राहुल गांधी यांनी चार हजार किमीची भारत जोडो यात्रा केली. त्यामुळे त्यांना रोज सहा ते सात किमी अंतर चालावे लागायचे. त्याचा त्रासही झाला.

राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेत झाला होता हा त्रास, केरळात सुरु होते आठवडाभर उपचार
rahul gandhi Image Credit source: socialmedia
| Updated on: Jul 30, 2023 | 8:53 PM
Share

केरळ | 30 जुलै 2023 : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची चार हजार किमीची भारत जोडो यात्रा केली. परंतू ही यात्रा करताना त्यांना दुखणं जडलं होतं. त्यामुळे राहुल गांधी यांनी केरळच्या प्रसिद्ध कोट्टक्कल आर्य वैद्यशाळेमध्ये आठवडाभर उपचारा केल्यानंतर त्यांना आता बरे वाटू लागल्याने त्यांची या आर्युर्वेदिक रुग्णालयातून सुटका झाली आहे. त्यांनी रुग्णालयात काळजी घेणाऱ्या डॉक्टर आणि स्टाफचे आभार मानले आहे.

राहुल गांधी यांनी चार हजार किमीची भारत जोडो यात्रा केली. त्यामुळे त्यांना रोज सहा ते सात किमी अंतर चालावे लागायचे. त्याचा त्रासही झाला. त्यांना गुडघे दुखीला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांनी केरळ येथील प्रसिद्ध आयुर्वेदिक संस्थानात आपल्या गुडघ्यावर उपचार केले. राहुल गांधी यांनी फेसबुक पोस्टवर लिहीले की रुग्णालयात काही दिवस राहील्यानंतर मला आता ताजेतवाने वाटत आहे. त्यांनी रुग्णालयातील वास्तव्या दरम्यान त्यांची काळजी घेणाऱ्या प्रेमाने सुश्रृषा करणाऱ्या वैद्यक आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

कर्मचाऱ्यांचे हार्दिक धन्यवाद

फेसबुकच्या पोस्टमध्ये राहुल गांधी लिहीतात की, कोट्टक्कल मधील आर्य वैद्यशाळेतील माझा अनुभव मला ताजातवाना करणारा आहे. माझी काळजी घेणाऱ्या आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या डॉ. पी. एम. वेरियर आणि त्यांच्या टीम तसेच रुग्णालयाच्या अन्य कर्मचाऱ्यांचे हार्दिक धन्यवाद देत आहे.

भारत जोडो यात्रा काय होती

कन्याकुमारीपासून सुरु झालेली राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा श्रीनगरमध्ये समाप्त झाली होती. 12 राज्ये आणि 2 केंद्र शासित प्रदेशतातून ही यात्रा गेली.राहुल गांधी यांनी या यात्रेत 3 हजार 570 किलोमीटरचा प्रवास रात्रीचा मुक्काम करीत पायी केला होता. गेल्यावर्षी 7 डिसेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरु झालेली ही भारत जोडो यात्रा 30 जानेवारी रोजी 146 दिवसांनी संपली.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.