AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजस्थानातही बलात्कार झाला, मग राहुल गांधी तिकडे का गेले नाहीत?- आठवले

रामदास आठवले यांनी कालच हाथरसमध्ये जाऊन पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.

राजस्थानातही बलात्कार झाला, मग राहुल गांधी तिकडे का गेले नाहीत?- आठवले
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Oct 07, 2020 | 5:43 PM
Share

मुंबई: राहुल गांधी हे केवळ भाजपची बदनामी व्हावी, या हेतूनेच हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला गेले होते, असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. राजस्थानमध्येही हाथरसप्रमाणे बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. मग राहुल गांधी त्याठिकाणी भेट देण्यासाठी का गेले नाहीत? ते केवळ भाजपची सत्ता असलेल्या ठिकाणीच प्रशासनाची बदनामी करू पाहत आहेत, अशी टीका आठवले यांनी केली. त्यामुळे आता काँग्रेसकडून या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (Ramdas Athawale slams Rahul Gandhi)

हाथरस बलात्कार प्रकरणावरून विरोधक सातत्याने भाजपला लक्ष्य करत आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी नुकतीच बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. सुरुवातीला राहुल आणि प्रियांका गांधी यांना हाथरसला जाण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही त्यांनी हाथरसच्या दिशेने कूच केले होते. मात्र, पोलिसांनी या दोघांनाही हाथरसला जाण्यापासून रोखले. यावेळी राहुल आणि प्रियांका गांधी यांना धक्काबुक्कीही झाली होती.

दरम्यान, राहुल गांधी यांनी आज ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हाथरस प्रकरणावरुन पुन्हा एकदा लक्ष्य केले. उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण व्यवस्था पीडितेच्या कुटुंबावर आक्रमण करते आणि पंतप्रधान एक शब्दही बोलत नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

हाथरस प्रकरणाला वेगळे वळण हाथरस बलात्कार प्रकरणाचे भांडवल करुन जातीय दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा दावा योगी सरकारने काही दिवसांपूर्वी केला होता. यानंतर दंगल पसरवण्याच्या आरोपाखाली मेरठमधून चार संशयितांना अटक करण्यात आली होती. या चौघांचाही पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संघटनेशी संबंध असल्याचे समोर आले आहे. हाथरस प्रकरणाला जातीय रंग देण्यासाठी मॉरिशसमधून तब्बल 50 कोटी रुपयांचा निधी आल्याचा दावाही ‘ईडी’ने केला आहे.

संबंधित बातम्या:

Hathras case: जातीय दंगली पसरवण्यासाठी मॉरिशसमधून 100 कोटींचा निधी, ED चा दावा

रामदास आठवलेंकडून हाथरस पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट

(Ramdas Athawale slams Rahul Gandhi)

Follow Us
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र 'या' नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण...
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?