AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Mandir : अयोध्येतून आलेल्या अक्षता तुम्हाला ही मिळाल्या का? जाणून घ्या त्याचं काय करायचं

Ayodhya ram mandir : सध्या देशात सगळीकडे राममय वातावरण पाहायला मिळत आहे. अयोध्येत श्री राम विराजमान होणार आहेत. त्याआधी रामभक्त आपल्या सर्वांपर्यंत अक्षता घेऊय पोहोचले आहेत. त्यामुळे अनेकांना या अक्षतांचे करायचे काय असा प्रश्न पडला आहे. जाणून घ्या त्या अक्षता का देण्यात आल्या आहेत.

Ram Mandir : अयोध्येतून आलेल्या अक्षता तुम्हाला ही मिळाल्या का? जाणून घ्या त्याचं काय करायचं
| Updated on: Jan 20, 2024 | 8:36 PM
Share

Ayodhya Akshata : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले असून सोमवारी २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ज्या दिवसाची शेकडो वर्षापासून वाट पाहिली जात होती. तो दिवस अखेर जवळ आला आहे. भव्य असे राम मंदिर बनून तयार आहे. राम मंदिरात होत असलेल्या या सोहळ्याच्या निमित्ताने जगभरातील राम भक्तांच्या मनात उत्साहाचे वातावरण आहे. हा दिवस दिवाळीसारखा साजरा केला जाणार आहे. या दिवसाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून नाही तर जगभरातून हजारो लोक अयोध्येत येणार आहेत. २२ जानेवारी रोजी मोजक्या लोकांनाच येथे प्रवेश मिळणार आहे. त्यानंतर मात्र सर्वांसाठी हे मंदिर खुले होणार आहे.

सध्या घरोघरी जावून रामभक्त लोकांना अयोध्येतून आलेल्या अक्षत: देत आहेत. याच्या माध्यमातून लोकांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण देखील दिल जात आहे. पण अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की, या अक्षत:चे करायचे काय.

अक्षता देऊन निमंत्रण देण्याची जुनी पंरपरा

भारतीय परंपरेनुसार, प्राचीन काळापासून लोकं त्यांच्या घरी कोणत्याही शुभ कार्यासाठी लोकांना आमंत्रित करण्यासाठी अक्षताचा वापर करत असत. लग्नाची पत्रिका देताना देखील अनेक जण सोबत अक्षत: देतात. जे हळदीने रंगवलेले असतात. कारण हिंदू धर्मात त्याला विशेष महत्त्व आहे. कोणत्याही धार्मिक कार्यात अक्षता वापरल्या जातात.

निमंत्रणात दिलेल्या अक्षताचं काय करायचं?

ज्योतिषशास्त्रानुसार तांदूळ हे शुक्र ग्रहाचे प्रतिनिधी आहे. ज्यामुळे धन आणि वैभव प्राप्त होते. त्यामुळे ते तांदूळ तुम्ही लाल रेशमी कापडात बांधून तिजोरीत ठेवू शकता. यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी देखील येतेय.

तुम्ही हे अक्षता तुमच्या देवघरात देखील ठेवू शकता. किंवा तुमच्या जवळच्या मंदिरात देखील जावून देवावर अर्पण करु शकता. तुम्ही तुमच्या घरी एखाद्या शुभकार्यात देखील त्याचा वापर करु शकता.

ज्यांच्या घरात विवाह होणार असेल. त्या अक्षतांमध्ये देखील हे अक्षता तुम्ही मिसळू शकता. या शिवाय औक्षण करताना देखील हे तांदूळ तुम्ही वापरु शकता.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.