AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रतन टाटा यांची लक्षद्वीपला मोठी भेट, मालदीव वादानंतर महत्वाचा निर्णय

Boycott Maldives Trend: भारत आणि मालदीवमधील वादात लक्षद्वीप चर्चेत आले आहे. या वादात सर्वच भारतीय सहभागी झाले असून सोशल मडियावर Boycott Maldives Trend सुरु झाला आहे. बॉलीवूडने लक्षद्वीपच्या पर्यटनासाठी मोहीम सुरु केली आहे. त्याचवेळी उद्योगपती रतन टाटा यांनी लक्षद्वीपसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे.

रतन टाटा यांची लक्षद्वीपला मोठी भेट, मालदीव वादानंतर महत्वाचा निर्णय
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 10, 2024 | 8:44 AM
Share

नवी दिल्ली, दि. 10 जानेवारी 2024 | मालदीवमधील निवडणुकीनंतर त्या देशात सरकार बदलले. नवीन सरकारने चीनशी जवळीक साधली आहे. मालदीपला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुटनीती आखली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दौरा केला. तेथील निसर्गरम्य आणि सुंदरतेचे फोटो शेअर केले. पर्यंटकांना लक्षद्वीप येण्याचे आवाहन केले. त्यानंतर लक्षद्वीपकडे जगाचे लक्ष वेधले गेले. गुगलमध्ये लक्षद्वीप सर्च करण्याचे प्रमाण ३४०० टक्के वाढले. यामुळे मालदीवमधील तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वक्तव्य केले. अर्थात भारताने यासंदर्भात मालदीव सरकारकडे आक्षेप नोंदवताच या तिन्ही मंत्र्यांना निलंबित करण्यात आले. सध्या सोशल मीडियावर बायकोट मालदीव ट्रेंड सुरु झाला आहे. आता उद्योगपती रतन टाटा यांनी लक्षद्वीपसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे लक्षद्वीपच्या पर्यटनास वाव मिळणार आहे.

लक्षद्वीपमधील सर्वात मोठी अडचण दूर

रतन टाटा यांनी लक्षद्वीपमधील सर्वात मोठी अडचण दूर केली आहे. जगातील सर्वात सुंदर क्षेत्र असलेल्या लक्षद्वीपकडे काही अडचणींमुळे पर्यटक येऊ शकत नव्हते. लक्षद्वीप पर्यटन विभागाची पॉलीसी 2020 मध्ये आली होती. त्यात लक्षद्वीपकडे पर्यटक का येत नाही? त्यासंदर्भात काही कारण दिले होते. त्यात महत्वाचे कारण म्हणजे राहण्याची चांगली व्यवस्था नाही, हे होते. सध्या संपूर्ण लक्षद्वीपमध्ये फक्त 184 बेडची व्यवस्था आहे. यामुळे रतन टाटा यांनी लक्षद्वीपमध्ये इंडियन हॉटल्स कंपनीचे दोन बँण्डेड रिसोर्ट उघडण्याची घोषणा केली आहे. त्यांचे हे रिसोर्ट 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. या हॉटेलची निर्मिती IHCL करणार आहे. हे हॉटेल सुहेली आणि कदमत बेटावर उघडण्यात येणार आहे.

केंद्र सरकारकडून लक्षद्वीपच्या विकासाकडे लक्ष

मालदीवपेक्षा लक्षद्वीपचा समुद्र किनारा सुंदर दिसत असल्याचा दावा सोशल मीडियावर होत आहे. यामुळे हजारो भारतीयांनी मालदीममधील आपले बुकींग रद्द केले आहे. त्याचवेळी केंद्र सरकारने लक्षद्वीपच्या विकासाकडे लक्ष दिले आहे. IHCL चे एमडी आणि सीईओ पुनीत चटवाल यांनी सांगितले की, टाटा ग्रुपचे दोन जागतिक दर्जाचे रिसोर्ट जगभरातील पर्यटकांना लक्षद्वीपकडे आकर्षित करतील. 36 बेटांचा या समूहावर बंगाराम, अगत्ती, कदमथ, मिनिकॉय, कवरत्ती आणि सुहेली यासारखे अनेक पर्यटन स्थळ आहे.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण