AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच बॉलिवूड कलाकारांच्या निर्भिड प्रतिक्रिया; कोण काय काय म्हणालं?

गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत सुरु असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच बॉलिवूड कलाकारांच्या निर्भिड प्रतिक्रिया; कोण काय काय म्हणालं?
Image Credit source: Social media
| Updated on: Jul 25, 2026 | 4:24 PM
Share

गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली सुरु असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. देशभरात विद्यार्थी आंदोलन करत असतानाच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या. अनेक बॉलिवूड कलाकार आणि सेलिब्रिटींनीही या घडामोडींवर आपली मते व्यक्त केले आहे.

अभिनेत्री रिद्धी डोगरा हिने लोकशाही एका दिवसात निर्माण झालेली नसून नागरिकांच्या सातत्यपूर्ण सहभागातून ती मजबूत होत असल्याचे म्हटले. आजचा दिवस प्रत्येकाच्या आवाजात ताकद असल्याची जाणीव करून देतो. भारताचे भविष्य तरुणांच्या हातात आहे असे तिने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. तसेच देशभक्ती म्हणजे देश आपल्यासाठी काय करतो यापेक्षा आपण देशासाठी काय करतो हे अधिक महत्त्वाचे असल्याचेही तिने सांगितले.

गायक अरमान मलिक याने युवकांची ताकद असा छोटा संदेश शेअर केला.

अभिनेता सनी हिंदुजा यानेही विद्यार्थ्यांचे कौतुक करत, एकत्र उभे राहिल्यास मोठा बदल घडवून आणता येतो. हा दिवस इतिहासात नोंदला जाईल अशी प्रतिक्रिया दिली.

अभिनेत्री राशी खन्ना हिने प्रत्येक लढा मथळा बनत नाही, पण सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा संघर्ष देशासमोर आला असे म्हटले. तर शिबानी अख्तर हिने आजच्या पिढीच्या जिद्दीचे आणि निर्धाराचे कौतुक करत आनंद व्यक्त केला.

अभिनेता अभिषेक बॅनर्जी याने डीपी बदलली… Gen Z चे अभिनंदन असे म्हणत एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले. कॉमेडियन पारितोष यांनी सकारात्मक विचारांचा सन्मान करण्याची गरज असल्याचे नमूद केले.

दरम्यान, अभिनेता विजय वर्मा याने धर्मेंद्र प्रधान यांचा फोटो शेअर करत ‘अच्छा चलता हूँ… दुआओं में याद रखना’ असे कॅप्शन दिले. वीर दास याने प्रार्थना, भारतीय ध्वज आणि हृदयाचे इमोजी शेअर करून प्रतिक्रिया दिली.

View this post on Instagram

A post shared by Vijay Varma (@itsvijayvarma)

अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिनेही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची माहिती आपल्या सोशल मीडिया स्टोरीवर शेअर केली. सध्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर या विषयावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून प्रतिक्रिया येत आहेत.

Follow Us
अखेर मुलाच्या कष्टाचं चीज झालं; दीपके यांच्या आईची भावनिक प्रतिक्रिया
रात्रभर झोप नव्हती... अखेर मुलाच्या कष्टाचं चीज झालं; प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दीपके यांच्या आईची भावनिक प्रतिक्रिया
आत्ता जर सरकारने ऐकलं नाही तर... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर...
आत्ता जर सरकारने ऐकलं नाही तर... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर दमानियांची सुचक प्रतिक्रिया
This is the Beginning of the End... मोदी सरकारचा शेवट जवळ आलाय
This is the Beginning of the End... मोदी सरकारचा शेवट जवळ आलाय; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया
इकडे धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा तिकडे मुख्यमंत्री फडणवीस थेट दिल्लील
इकडे धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा तिकडे मुख्यमंत्री फडणवीस थेट दिल्लीला रवाना; मोठ्या...
उशिरा का होईना, न्याय मिळालाच, ही युवा पिढी जिंकली! - सुप्रिया सुळे
Supriya Sule | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; उशिरा का होईना, न्याय मिळालाच, ही युवा पिढी जिंकली!
भर मंचावरूनच... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंची पहिली...
भर मंचावरूनच... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, पहा व्हिडीओ
धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा
Dharmendra Pradhan Resign | धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा देताच...
NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा
मोठी बातमी! NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा
दिल्लीत मोठ्या घडमोडी! पुन्हा पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज अन्....
दिल्लीत मोठ्या घडमोडी! पुन्हा पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज अन् जंतर मंतरवर मोठा गोंधळ
गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की... अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन
गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की... अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन असं काय म्हणाला?