AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangna Ranaut : कंगना राणौत संसदेत बसायच्या लायकीची नाही… कोणी साधला निशाणा ?

अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत सध्या अनेक त्यांच्या अनेक वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. शेतकरी आंदोलनासंदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्याने मोठा गदारोळ माजला. दरम्यान, रॉबर्ट वाड्रा यांनी कंगनावर जोरदार हल्ला चढवला आहे.

Kangna Ranaut : कंगना राणौत संसदेत बसायच्या लायकीची नाही... कोणी साधला निशाणा ?
Image Credit source: social media
| Updated on: Aug 31, 2024 | 8:42 AM
Share

प्रसिद्ध अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार कंगना राणौत या सतत चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांन शेतकरी आंदोलनाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे बराच गदारोळ माजली, देशभरातून अनेक प्रतिक्रियाही व्यक्त झाल्या. त्यानंतर भाजपतर्फे त्यांना समजही देण्यात आल्याचे वृत्त समोर आले. याचदरम्यान आता कंगना यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. ‘ कंगना राणौत या संसदेच्या सदस्य (खासदार) बनण्याच्या लायकीच्या नाहीत. त्या फक्त स्वतःचा विचार करतात’ अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांनी केली. शेतकरी आंदोलनावरून कंगना यांनी केलेल्या वक्तव्यानंतर रॉबर्ट वड्रा यांनी हे टीकास्त्र सोडलं. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर संपूर्ण देशाला एकत्र यावे लागेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या या विधानाचे आता काय पडसाद उमटतात त्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

रॉबर्ट वड्रा यांचे टीकास्त्र

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांचे साठी शुक्रवारी हैदराबाद येथे आगमन झाले. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ‘ कंगना राणौत या एक स्त्री आहेत, मी त्यांचा आदर करतो. पण त्या संसदेत बसण्याच्या लायकीच्या आहेत, असं मला वाटत नाही’ असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, ‘ त्या (कंगना) शिक्षित नाहीत. मला असं वाटतं की त्या (इतर) लोकांबाबत विचार करत नाहीत. त्या फक्त फक्त स्वतःचा विचार करतात. त्यांनी महिलांचा विचार करायला हवा. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर संपूर्ण देशाने एकत्र पुढे आले पाहिजे ‘ असे माझे आवाहन आहे. ‘ महिलांची सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असून तो सोडवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवे’ असे मतही रॉबर्ट वड्रा यांनी व्यक्त केले.

काय म्हणाल्या होत्या कंगना राणावत ?

“शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या. बरं झालं केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेतले. अन्यथा तिथे मोठं षडयंत्र रचलं जात होतं. ते लोक काहीही करू शकले असते”, असं वक्तव्य कंगनाने केलं होतं. “शेतकरी आंदोलनावेळी देशाचे नेतृत्व मजबूत नसतं, तर या लोकांनी पंजाबमध्ये बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण केली असती. त्यासाठी मोठी योजना तयार होती. शेतकरी आंदोलनाच्या नावावर जे काही सुरु होत होतं, ते सर्वांनी बघितली आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आंदोलकांना धक्का बसला होता”, असं कंगना यांनी म्हटलं होतं.

यानंतर भाजपने भूमिका जाहीर केली. कंगना राणावत यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजप पक्षाशी काहीच संबंध नाही, असं भाजपने अधिकृत पत्र जाहीर करत म्हटलं. त्यांच्या वक्तव्यानंतर भाजपने ही भूमिका जाहीर केली.

Follow Us
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...
मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक
Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?