AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohan Bhagwat : लिव्ह इन रिलेशनशिपवर RSS प्रमुख मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य

Mohan Bhagwat : "कुटुंब, लग्न हे फक्त शारिरक समाधानाचं माध्यम नाहीय, हा एक समाजाचा एक भाग आहे. कुटुंब अशी एक जागा आहे, जिथे कुठलाही व्यक्ती समाजात राहणं शिकतो. लोकांना मूल्य तिथूनच मिळतात" असं मोहन भागवत म्हणाले.

Mohan Bhagwat : लिव्ह इन रिलेशनशिपवर RSS प्रमुख मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य
Mohan Bhagwat
| Updated on: Dec 22, 2025 | 9:34 AM
Share

भारतीय समाज व्यवस्थेतील कुटुंबाच्या रचनेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आपले विचार मांडले. पश्चिम बंगाल कोलकत्ता येथे एका RSS च्या कार्यक्रमात ते बोलत होते. लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणारे लोक जबाबदारी घेण्यासाठी तयार नाहीत, असं ते म्हणाले. “लिव्ह इन रिलेशनशिपची कॉन्सेप्ट सर्वांसमोर आहे. यात तुम्ही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. हे योग्य नाही” असं मोहन भागवत म्हणाले. “कुटुंब, लग्न हे फक्त शारिरक समाधानाचं माध्यम नाहीय, हा एक समाजाचा एक भाग आहे. कुटुंब अशी एक जागा आहे, जिथे कुठलाही व्यक्ती समाजात राहणं शिकतो. लोकांना मूल्य तिथूनच मिळतात” असं मोहन भागवत म्हणाले.

“कुटुंब हे एक संस्कृती आणि अर्थव्यवस्थेच संगम आहे. काही मूल्य स्वीकारुन तुम्ही समाजाला आकार देतात. आपल्या आर्थिक गोष्टी सुद्धा कुटुंबाच्या माध्यमातून होतात. बचत,सोनं हे कुटुंबांमध्ये आहे, सांस्कृतिक विभाग, आर्थिक विभाग आणि सामाजिक विभाग कुटुंबामध्ये आहे. लग्न करायचं नसेल, तर सन्यासी बना, चालेल” असं मोहन भागवत म्हणाले.

किती मुलं आदर्श?

कुटुंब व्यवस्थेबद्दल बोलताना मोहन भागवत म्हणाले की, “मुलांची संख्या ठरवणं किंवा लग्नाचं वय ठरवण्याचा कुठलाही फॉर्म्युला नाही. पण रिसर्चवरुन असं लक्षात आलय की, तीन मुलं आदर्श ठरु शकतात. लग्न 19 ते 25 वयोगटात होऊ शकतं”

तीन मुलं झाल्यास लोक ईगो मॅनेजमेंट शिकतात

“किती मुलं झाली पाहिजेत, हे कुटुंबामध्ये ठरतं. याचा कुठला फॉर्म्युला नाहीय. मी डॉक्टरांशी बोलून काही माहिती मिळवलीय, त्यानुसार लग्न लवकर खासकरुन 19 ते 25 वयोगटात झालं. तीन मुलं झाली, तर आई-वडिल आणि मुलांचं आरोग्य चांगलं राहतं. मानसोपचारतज्ज्ञांनुसार, तीन मुलं झाल्यास लोक ईगो मॅनेजमेंट शिकतात” असं मोहन भागवत म्हणाले.

लोकसंख्या एक ओझं आहे

“लोकसंख्या एक ओझं आहे. पण ही एक संपत्ती सुद्धा आहे. आपल्याला पर्यावरण, इंफ्रास्ट्रक्चर, सुविधा, महिलांची स्थिती, त्यांचं आरोग्य आणि देशाच्या आवश्यकता लक्षात घेऊन पुढच्या 50 वर्षांचा विचार करुन एक पॉलिसी बनवली पाहिजे” असं मोहन भागवत म्हणाले.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.