AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आणीबाणीच्या काळात RSS च्या हजारो कार्यकर्त्यांना अटक; तुरुंगात छळ, अनेकांचा मृत्यू – सुनील आंबेकर

आजच्या दिवशी 50 वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली होती. या आणीबाणीत आरएसएसच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आली होती.

आणीबाणीच्या काळात RSS च्या हजारो कार्यकर्त्यांना अटक; तुरुंगात छळ, अनेकांचा मृत्यू - सुनील आंबेकर
rss sunil ambekar
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 25, 2025 | 4:48 PM
Share

आजच्या दिवशी 50 वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली होती. या आणीबाणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आली होती, तसेच अनेकांचा मृत्यू झाला होता अशी माहिती आरएसएसचे प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

सुनील आंबेकर यांनी सांगितले की, ’25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली होती, त्यावेळी संघाच्या हजारो कार्यकर्त्यांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आले होते. तसेच त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे छळ करण्यात आला होता. या आणीबाणीच्या काळात किमान 100 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला, त्यापैकी काही जण तुरुंगात तर काही तुरुंगातून बाहेर आल्यावर मरण पावले होते. यात तत्कालीन अखिल भारतीय प्रणाली समितीचे प्रमुख पांडुरंग क्षीरसागर यांचाही समावेश होता.’

आणीबाणी लोकशाहीवरील कलंक

सुनील आंबेकर यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘आणीबाणी ही भारताच्या लोकशाहीवरील काळा डाग आहे. देशातील ही 21 महिन्यांची हुकूमशाही कधीही विसरता न येणारी आहे. त्याचबरोबर सरकार आणि आणीबाणीला पाठिंबा देण्यासाठी संघाच्या कार्यकर्त्यांचा छळ करण्यात आला, त्यांना थर्ड डिग्री देखील देण्यात आली.’

स्वयंसेवकांना अटक

आंबेकर पुढे बोलताना म्हणाले की, 1975 साली संघाचे सुमारे 1300 प्रचारक होते. त्यातील 189 प्रचारकांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी संघाच्या देशभरात 50 हजार शाखा होत्या, या शाखांच्या माध्यमातून देशभरात लोकशाही वाचवा चळवळ सुरु केली होती.

संघाच्या चळवळीत 80 हजार ते 1 लाख लोकांचा सहभाग

आंबेकर यांनी म्हटले की, ‘संघाच्या चळवळीत 80 हजार ते एक लाख लोकांनी भाग घेतला होता, यामुळे आणीबाणी संपली आणि पुन्हा निवडणुका जाहीर झाल्या.आणीबाणीतील पीडित लोकांच्या आठवणीसाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षी 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.’

Follow Us
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे