AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समृद्धी महामार्गाचे फायदे!

चला तर मग जाणून घेऊयात समृद्धी महामार्गाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी.

समृद्धी महामार्गाचे फायदे!
samruddhi mahamarg Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 11, 2022 | 12:24 PM
Share

भाजप-शिवसेना युतीच्या काळात फडणवीस मुख्यमंत्री असताना या समृद्धी महामार्गाचे बांधकाम सुरू झाले. विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन या वर्षाच्या सुरुवातीला होणार होते, परंतु कोविड महामारीमुळे त्याला उशीर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाचं लोकार्पण संपन्न झालंय. चला तर मग जाणून घेऊयात समृद्धी महामार्गाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी.

  1. या महामार्गाचं हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असं अधिकृत नामकरण करण्यात आलंय. मुंबई-नागपूर सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे म्हणूनही त्याची ओळख आहे.
  2. सरकारच्या मते, 701 किलोमीटर लांबीच्या या महामार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भ या भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. हे दोन्ही प्रदेश दुष्काळी भाग आहेत.
  3. हा एक्स्प्रेस वे 520 किमीसाठी सज्ज असला तरी उर्वरित 181 किमीचा महामार्ग 2024 पर्यंत तयार होईल. यामुळे शिर्डी आणि मुंबई जोडली जाणारे आणि महामार्ग भिवंडी जिल्ह्यात संपणार आहे.
  4. नागपूरहून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या (JNPT) दिशेने जाणाऱ्या व्यावसायिक वाहनांद्वारे द्रुतगती मार्गाचा वापर केला जाणार असल्याने, ठाण्यातील वडपे ते माजिवडा या भागांदरम्यानच्या साडेतीन किलोमीटर लांबीच्या मुंबई-नाशिक महामार्गाचे (NH3) नूतनीकरण करण्याचाही सरकारचा विचार आहे.
  5. एक्स्प्रेस वे खुला झाल्यानंतर राज्यातील पर्यटनालाही चालना मिळेल अशी अपेक्षा आहे कारण यामुळे शिर्डी, लोणार सरोवर, वेरूळ, अजिंठा, औरंगाबाद, एलोरा, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, घृष्णेश्वर, पंचवटी आणि इगतपुरी मधील हिल स्टेशन जोडले जाणार आहेत.
  6. महामार्गामुळे नागपूर ते मुंबई प्रवासाचा वेळ जवळपास सहा तासांनी कमी होणार आहे. सध्या मुंबई-धुळे (NH3) आणि धुळे-नागपूर (NH6) दरम्यानचा प्रवासाचा वेळ 16 तासांच्या जवळपास आहे. म्हणजे नागपूर ते मुंबई अंतर जवळपास 9 ते 10 तासात पार करता येणार.
  7. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे अंदाजे 55 हजार कोटी रुपये खर्चून आठ पदरी मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती महामार्ग बांधण्यात येत आहे.
  8. हा द्रुतगती मार्ग राज्यातील 14 जिल्हे, सहा तालुके आणि 392 गावांमधून जाणार आहे.
  9. हा महामार्ग देशातील सर्वात वेगवान महामार्ग म्हणूनही ओळखला जात आहे. या महामार्गावर आपण 150 किमी प्रतितास वेगाने वाहन चालवू शकतो.

शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया.
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?.
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!.
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!.
काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खल्लंय! बन यांचा राऊतांना टोला
काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खल्लंय! बन यांचा राऊतांना टोला.
महापौर रितू तावडेंचे अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश
महापौर रितू तावडेंचे अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश.
आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? शंभुराज देसाईंचा थेट सवाल
आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? शंभुराज देसाईंचा थेट सवाल.
स्पिरीट ऑफ मुंबईच्या नावाखाली लोकलचा जीवघेणा प्रवास! व्हिडीओ व्हायरल
स्पिरीट ऑफ मुंबईच्या नावाखाली लोकलचा जीवघेणा प्रवास! व्हिडीओ व्हायरल.
टी20 विश्वचषकात उलटफेर: झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले
टी20 विश्वचषकात उलटफेर: झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले.
चंद्रपूर : भाजप-ठाकरे गटाची युती, मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल
चंद्रपूर : भाजप-ठाकरे गटाची युती, मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल.