Sanjay Raut : त्या दोघांचं किडनॅपिंग..ठाकरे गटाची बैठक संपताच संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut : ठाकरे गटाच्या फुटलेल्या सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सहीचं एक पत्र दिलं. त्यात ओमराजे आणि संजय पाटील यांची सही नसल्याचं बोललं जात आहे. ते उद्धव ठाकरे गटासोबत आहेत, असा दावा केला जात होता.

उद्धव ठाकरे गटात फूट पडल्याचं आज स्पष्ट झालं आहे. पक्षाकडून व्हीप जारी करुन बैठक बोलवण्यात आली होती. पण सहा खासदार या बैठकीला अनुपस्थित राहिले. या सहाखासदारांपैकी दोन खासदार अजूनही आपल्यासोबत आहेत असा संजय राऊत यांना विश्वास वाटतो. खासदार ओमराजे निंबाळकर आणि संजय दीना पाटील यांच्या बाबतीत संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. “ओमराजे निंबाळकर हे पुण्यात आहेत हे मी तुम्हाला दाव्याने सांगतो. भले, ते आमच्यासोबत बैठकीला आले नसतील पण ते त्यांच्यासोबतही नाहीत” “ते कुठे आहेत, शिंदेंच्या गुंडांनी त्यांना किडनॅप केलय का?.त्यांच्या जीवाला काही धोका आहे का? हे पहावं लागेल. ते लोक काहीही करु शकतात. आमच्या माहितीनुसार ओमराजे निंबाळकर आणि संजय दीना पाटील हे दोघेही दिल्लीत नाहीत” असा दावा संजय राऊत यांनी केला.
ठाकरे गटाच्या फुटलेल्या सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सहीचं एक पत्र दिलं. त्यात ओमराजे आणि संजय पाटील यांची सही नसल्याचं बोललं जात आहे. ते उद्धव ठाकरे गटासोबत आहेत, असा दावा केला जात होता. पण उद्धव ठाकरे गटाने बोलवलेल्या बैठकीला सुद्धा हे दोन खासदार गैरहजर राहिले. त्यामुळे हे खासदार ठाकरे गटातून फुटले असं मानण्यात येत आहे.
घरी जाताना भारताच सैन्य घेऊन जावं लागेल
“चार-पाच खासदार म्हणजे पक्ष नाही. त्यांना खासदार बनवणारा पक्ष आहे, ते कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरले आहेत. उतरत राहणार. त्यांना घरात राहण कठीण होईल, हे मी ऑनरेकॉर्ड बोलतोय. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात जाऊन दाखवावं. त्यांना घरी जायचं असेल तर भारताच सैन्य घेऊन जावं लागेल” असा दावा संजय राऊत यांनी केला. कोर्टाने चार वर्षापूर्वी निर्णय दिला असता तर ही वेळ आली नसती. या सगळ्यात देशाचं सर्वोच्च न्यायालयही गुन्हेगार आहे. देशात लोकशाही जी हालत आहे. त्यात सर्वात पहिलं गुन्हेगार सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग आहे” असा आरोप संजय राऊत यांनी केला.