AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरपंचाने बनवून दिलं चारित्र्याचं प्रमाणपत्र, लिहिली अशी गोष्ट, लोक म्हणाले शत्रू पण असं काम करणार नाही

अनेकदा एखाद्या सरकारी कामासाठी तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्राची गरज भासते. हे चारित्र्याच प्रमाणपत्र शहरी भागांमध्ये तेथील नगरसेवकाकडून आणि गावात सरपंचाकडून घेतलं जातं. असंच एक चारित्र्याचं प्रमाणपत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.

सरपंचाने बनवून दिलं चारित्र्याचं प्रमाणपत्र, लिहिली अशी गोष्ट, लोक म्हणाले शत्रू पण असं काम करणार नाही
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 06, 2025 | 6:26 PM
Share

अनेकदा एखाद्या सरकारी कामासाठी तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्राची गरज भासते. हे चारित्र्याच प्रमाणपत्र शहरी भागांमध्ये तेथील नगरसेवकाकडून आणि गावात सरपंचाकडून घेतलं जातं. सामान्यपणे चारित्र्य प्रमाणपत्रात संबंधित व्यक्तीबद्दल चांगल्या-चांगल्या गोष्टी लिहिलेल्या असतात, तुम्ही संबंधित संस्थेला हे चारित्र्याचं प्रमाणपत्र दिल्यानंतर तुमचं काम पूर्ण होतं. मात्र तु्म्हाला नगरसेवकानं किंवा सरपंचाने दिलेल्या चारित्र्य प्रमाणपत्रात जर काही गडबड असेल तर मात्र तुमच्या कामात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. नुकताच असाच एक प्रकार एका व्यक्तीच्या बाबतीत घडला आहे, या वक्तीला त्याच्या गावच्या सरपंचांनी दिलेलं चारित्र्याचं प्रमाणपत्र इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल झालं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

सध्या सोशल मीडियावर एक चारित्र्याचं प्रमाणपत्र प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र हे प्रमाणपत्र खोट आहे की खरं? याबाबत अद्याप कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेला नाहीये. मात्र हे प्रमाणपत्र ज्या पद्धतीनं लिहिण्यात आलं आहे, ते पाहून हे खरं असावं असं वाटत आहे. हे चारित्र्याचं प्रमाणपत्र ज्ञानचंद्र बैरवा नावाच्या व्यक्तीचं आहे. हा व्यक्ती राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातल्या जयसिंहपूरा गावचा रहिवासी आहे, हे प्रमाणपत्र देखील त्याला जयसिंहपूराच्या सरपंचांनीच दिलं आहे.

या चारित्र्य प्रमाणपत्रामध्ये सुरुवातील या व्यक्तीचं त्याच्या वडिलाचं आणि त्याचं आडनाव लिहिलेलं आहे. मात्र या पत्रात जो मजकूर लिलिहेला आहे, तो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकजण तर हसू देखील आवरू शकले नाहीत. त्यामध्ये स्पष्ट शब्दात लिहीलं आहे की, मी या व्यक्तीला चांगलं ओळखतो. हा एक भांडखोर आणि शिवीगाळ करणारा व्यक्ती आहे. त्यानंतर या प्रमाणपत्राच्या खाली सरपंचांची सही देखील आहे. हे चारित्र्याचं प्रमाणपत्र त्याला 20 जुलै 2019 साली देण्यात आलं आहे, मात्र या चारित्र्याच्या प्रमाणपत्रामुळे या व्यक्तीच्या अडचणीत नक्कीच वाढ झाली असणार एवढं नक्की. हे चारित्र्याचं प्रमाणपत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्याच्यावर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.  

Follow Us
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागी मुंडेंना
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागा घेणार धनंजय मुंडे?
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग शिवसेनेचा कोणत्या पदावार दावा? शिंदेंनी दिलं थेट उत्तर
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60 हून अधिक...
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट!
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट! पत्रात मोठी विसंगती; 18 फेब्रुवारीशी काय कनेक्शन?
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली दौऱ्याआधीच एकनाथ शिंदेंनी...
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, काय घडणार?
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, पुढे काय घडणार?
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधानांना पत्र
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र
फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या
NCP | फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ